शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

कृषी महोत्सवाने दिला नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:20 IST

शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आत्माचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदानावर घेण्यात आला. याद्वारे कृषिविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभागाद्वारा करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकºयांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी २०० कक्षाद्वारे कृषीची महती व विक्री, विपणन आदीला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसंवादमध्ये शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक दिसून आली. शेतकºयांना अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय करण्यावर भर द्यावा, यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे शेतकºयांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आत्माचे जिल्हा प्रकल्पप्रमुख खर्चान म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी देशमुख, प्रदीप ओक व प्रगती अ‍ॅग्रोचे सुधीर जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.बचत गटांच्या स्टॉलवर ४७ लाखांची विक्रीया महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील बचतगटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लागले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तू, धान्य आदींची ४७ लाखांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाला किमान पाच हजार शेतकरी बांधवांनी भेट दिल्याचे ते म्हणाले.खारपानपट्यातील गावात आजपासून संवादजिल्ह्यातील खारपाणपट्टा असलेल्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान संवाद साधण्यात येणार आहे. या भागासाठी ‘पोखरा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारणपणे दर्यापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये नियोजनासंदर्भात हा दौरा असल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.