शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

कृषी महोत्सवाने दिला नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:20 IST

शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आत्माचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदानावर घेण्यात आला. याद्वारे कृषिविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभागाद्वारा करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकºयांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी २०० कक्षाद्वारे कृषीची महती व विक्री, विपणन आदीला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसंवादमध्ये शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक दिसून आली. शेतकºयांना अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय करण्यावर भर द्यावा, यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे शेतकºयांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आत्माचे जिल्हा प्रकल्पप्रमुख खर्चान म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी देशमुख, प्रदीप ओक व प्रगती अ‍ॅग्रोचे सुधीर जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.बचत गटांच्या स्टॉलवर ४७ लाखांची विक्रीया महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील बचतगटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लागले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तू, धान्य आदींची ४७ लाखांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाला किमान पाच हजार शेतकरी बांधवांनी भेट दिल्याचे ते म्हणाले.खारपानपट्यातील गावात आजपासून संवादजिल्ह्यातील खारपाणपट्टा असलेल्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान संवाद साधण्यात येणार आहे. या भागासाठी ‘पोखरा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारणपणे दर्यापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये नियोजनासंदर्भात हा दौरा असल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.