शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

कृषी महोत्सवाने दिला नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:20 IST

शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आत्माचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदानावर घेण्यात आला. याद्वारे कृषिविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभागाद्वारा करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकºयांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी २०० कक्षाद्वारे कृषीची महती व विक्री, विपणन आदीला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसंवादमध्ये शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक दिसून आली. शेतकºयांना अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय करण्यावर भर द्यावा, यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे शेतकºयांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आत्माचे जिल्हा प्रकल्पप्रमुख खर्चान म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी देशमुख, प्रदीप ओक व प्रगती अ‍ॅग्रोचे सुधीर जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.बचत गटांच्या स्टॉलवर ४७ लाखांची विक्रीया महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील बचतगटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लागले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तू, धान्य आदींची ४७ लाखांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाला किमान पाच हजार शेतकरी बांधवांनी भेट दिल्याचे ते म्हणाले.खारपानपट्यातील गावात आजपासून संवादजिल्ह्यातील खारपाणपट्टा असलेल्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान संवाद साधण्यात येणार आहे. या भागासाठी ‘पोखरा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारणपणे दर्यापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये नियोजनासंदर्भात हा दौरा असल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.