शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवाने दिला नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:20 IST

शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आत्माचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदानावर घेण्यात आला. याद्वारे कृषिविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभागाद्वारा करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकºयांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी २०० कक्षाद्वारे कृषीची महती व विक्री, विपणन आदीला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसंवादमध्ये शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक दिसून आली. शेतकºयांना अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय करण्यावर भर द्यावा, यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे शेतकºयांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आत्माचे जिल्हा प्रकल्पप्रमुख खर्चान म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी देशमुख, प्रदीप ओक व प्रगती अ‍ॅग्रोचे सुधीर जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.बचत गटांच्या स्टॉलवर ४७ लाखांची विक्रीया महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील बचतगटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लागले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तू, धान्य आदींची ४७ लाखांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाला किमान पाच हजार शेतकरी बांधवांनी भेट दिल्याचे ते म्हणाले.खारपानपट्यातील गावात आजपासून संवादजिल्ह्यातील खारपाणपट्टा असलेल्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान संवाद साधण्यात येणार आहे. या भागासाठी ‘पोखरा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारणपणे दर्यापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये नियोजनासंदर्भात हा दौरा असल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.