शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: March 14, 2015 00:38 IST

अतिवृष्टीते खचलेल्या विहिरींची प्रकरणे शासनाने मंजूर करुनसुध्दा अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. यामुळे काम तातडीने सुरू करण्यात यावे,

वरुड : अतिवृष्टीते खचलेल्या विहिरींची प्रकरणे शासनाने मंजूर करुनसुध्दा अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. यामुळे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार बाळासाहेब तिडके यांना घेराव घालण्यात आला. सन् २०१२ -२०१३ व २०१३ -२०१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वरूड तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या आहेत. खचलेल्या विहिरीसंदर्भात शासनाने विशेष बाब म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीतून गाळ काढणे, विहिरीचे बांधकाम करणे याकरिता रोजगार हमी योजने अंतर्गत बांधकामास पात्र एक हजार ५०० विहिरींना बांधकामाची मंजुरी दिली. पात्र ठरलेल्या खचलेल्या विहिरींना चार महिन्यंचा कालावधी लोटूनसुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. विहीर उपसण्याकरिता व बांधकाम करण्यासाठी शासनाने अद्यापही मंजुरात दिली नाही. विहीर बांधकामाचा कालावधी हा एप्रिल ते जूनपर्यंत असतो. या महिन्यात विहिरीची पातळी खोलवर जात असल्यामुळे गाळ उपसणे, बांधकाम करणे व याकरिता मंजुरी मिळणे सोयीचे होते. परंतु पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या अडेलतट्टु धोरणामुळे व दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे. सत्य परिस्थिती पाहिल्यास वरूड तालुका हा ड्रायझोन असल्यामुळे नवीन विहीर खोदण्यास शासन परवानगी देत नाही आणि दुसरीकडे मंजूर झालेल्या विहिरींचे बांधकाम करण्यास परवानगीसुद्धा देत देत नाही. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक अतिरिक्त पाण्यामुळे जागेवरच सडत आहे. शेतकऱ्यांचे मोटरपंप व पाईपसुद्धा विहिरीमध्ये दबल्यामुळे ते सडण्याच्या अवस्थेत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)