शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलकडून खोदकामाचे पावणे अकरा कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:23 IST

शहरात विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी एअरटेल मोबाईल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत.

आठ दिवसांपूर्वीच झाले जमा : रिलायन्सचे निकष लावले, १० टक्के दंड अमरावती : शहरात विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी एअरटेल मोबाईल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. एअरटेल कंपनीच्या खोदकामाचा विषय आमसभा व स्थायी समितीत गाजला होता, हे विशेष.महानगरात ४-जी इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भुयारी केबल टाकण्याचे काम विविध मोबाईल कंपन्यांकडून काही महिन्यांपासून सुरु आहे. रिलायन्स कंपनीने शहरभर खोदकाम सुरु करण्यापूर्वी महापालिकेतून रीतसर परवानगी घेतली आणि आणि शुल्कही भरले. याच दरम्यान एअरटेल कंपनीनेदेखील परवानगी घेऊन खोदकाम केले आणि केबल टाकण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, एअरटेलने मंजुरीपेक्षा अधिक खोदकाम केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कंपनीने नेमके किती खोदकाम केले याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांना दिले होते. एअरटेलच्या खोदकामाची पाहणी केली असता सुमारे १५ ते १६ किलोमीटरचे खोदकाम केल्याचे स्पष्ट झाले. सभागृहाच्या निर्णयानुसार कारवाईअमरावती : मंजुरीपेक्षा दुप्पट खोदकाम झाल्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला. परिणामी आयुक्तांनी दंडात्मक रकमेसह एकूण खोदकामाप्रकरणी पावणे अकरा कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावण्याचे सांगितले होते. मात्र या दंडामधून सूट मिळावी, यासाठी एअरटेलच्या एका अधिकाऱ्याने खा. आनंदराव अडसूळ यांना साकळे घातले. हे प्रकरण निस्तरण्याची विनंती केली. त्यानंतर खा. अडसूळ यांनी एअरटेल कंपनीला सहकार्य करण्याची जबाबदारी नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्यावर सोपविली होती. प्रशांत वानखडे यांनी आयुक्त गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींना भेटून एअरटेल कंपनीला दिलासा देण्यासाठी धावपळ चालविल्याची माहिती आहे. मात्र, प्रशांत वानखडे यांना एअरटेल खोदकाम प्रकरणी महापालिकेतून फारशी मदत झाली नसल्याचे समजते. अखेर सभागृहाच्या निर्णयानुसार एअरटेल कंपनीकडून पावणे अकरा कोटी रुपये वसूल करण्याची कार्यवाही प्रशासनाने केली. रिलायन्स कंपनीच्या निकषानुसार १० टक्के रक्कम वाढवून पावणे अकरा कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.