शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जळू-बेलोरा वळण रस्ता वाहतुकीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:59 IST

बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.

ठळक मुद्देविमानतळ विकासाने गाठला टप्पा : राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.बेलोरा विमानतळाच्या विकासकामांनी गती घेतली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्य मार्गावर कार्यारंभ झालेला जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. लांबीचा वळण रस्ता पूर्णत्वास आला आहे. नव्या वळण मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. पूल, रस्ता ओलांडणे, झेब्रा क्रॉसिंग, गावांची सीमा, गावांचे अंतर, पायदळ मार्ग अशी वाहतूक नियमावलींशी सुसंगत फलके वळण मार्गावर उभारण्यात आली आहे. वळण रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली की, यवतमाळकडे ये-जा करणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाच्या बेलोरा टी पॉइंट येथून जळू व पुढे यवतमाळ-अमरावती अशी जातील. यानंतर जुना यवतमाळ मार्ग बंद केला जाईल. त्यानंतर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम प्रारंभ होईल, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांनी दिली. हा वळण मार्ग साबांविच्या नियंत्रणात बांधला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे हा वळण मार्ग मुख्य मार्गाशी केव्हा जोडणार, असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वळण मार्गामुळे जळू गावाला झळाळी आली आहे.‘बी अँड सी’ला आदेशाची प्रतीक्षाजळू ते बेलोरा वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याची केवळ प्रतीक्षा आहे. विशेषत: पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा यांच्या सततच्या प्रयत्नाने विमानतळाची विकासकामे मार्गी लागत आहेत. वळण मार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला असला तरी विधिवत शुभारंभाशिवाय या मार्गावरून वाहने धावणार नाहीत, हे वास्तव आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणात जळू ते बेलोरा वळण मार्गाला जोडले जाईल. वळण रस्त्याची निर्मिती म्हणजे बेलोरा विमानतळ विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे.- प्रवीण पोटेपालकमंत्री, अमरावती.