शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

लग्न झाले, हनिमूनला जाण्यासाठी हवाय ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : कोरोन संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केले होते. यामुळे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष ...

अमरावती : कोरोन संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केले होते. यामुळे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखा (एसबी) व सायबर सेलकडे प्रवासाची परवानगी मागण्याकरिता अर्जांचा पाऊस पडू लागला होता. लग्नाला जायचे आहे. अंत्यसंस्कारला जायचे आहे. मुलांना सोडून द्यायचे आहे. आई-वडिलांच्या उपचाराकरिता जायचे आहे. इतकेच नव्हे, तर अनेकांचे लॉकडाऊनमध्ये लग्न उरकल्याने हनिमूनला जायचे असल्याचे कारण देत ई-पास मागण्यात आल्याची बाब पुढे आली. मात्र, पोलिसांनी ज्यांना खरेच गरज आहे, अशांनाच ई-पास दिली. मात्र, आता राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक झाल्याने ई-पासची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२ एप्रिल ते १ जून २०२१ दरम्यान पोलीस आयुक्तलयाकडून ई-पास मिळविण्याकरिता १४ हजार ७१४ जणांनी परवानगीचे ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी केवळ २ हजार ३३७ जणांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांगितले. तब्बल १२ हजार ३८१ जणांचे अर्ज सबळ कारणाऐवजी तसेच पोलिसांना ई- पास मिळविण्याचे कारण न पटल्याने नाकारण्यात आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने प्रवासासाठी ई-पास काढणे बंधनकारक केले होते. त्यामुळे अकारण प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले होेते. अंत्यसंस्कारासाठी जायचे असल्यास, रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचे असल्यास किंवा अत्यावश्यक कारणासाठीच पोलिसांकडून ई-पास मंजूर केले जात आहेत. याशिवाय माझे लग्न झाले आहे, हनिमूनला जायचे आहे, लहान मुलांना सोडायला जायचे आहे आदी कारणे सांगून ई-पास मागणाऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. योग्य कारण असेल, तरच प्रवासाची परवानगी पोलीस विभागाकडून दिली गेली.

पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपआयुक्त ( ॲडमिन) विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (विशेष शाखा) नीलिमा आरज, सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अर्जांची पडताळणी व परवानगी देण्याचे काम सुरु होते.

बॉक्स:

आता राज्य सीमा ओलांडण्यासाठी अर्ज

दुसऱ्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर आता नागरिकांना राज्यांतर्गत फिरण्यास ई-पासची आवश्यकता नाही. मात्र, राज्याची सीमा ओलांडण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या सीमारेषांवर ई-पास तपासणी केली जाईल व निर्णय घेतला जाईल.

बॉक्स:

ई-पास मिळविण्याकरीता वाटेल ते

ई-पास मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागला. या अर्जात अनेक जण प्रवासाची परवानी मिळविण्याकरीता काहीही कारे सांगत असल्याचे पोलिसांच्या निदशर्नास आले. लग्नाला जायचे आहे. फिरायला जायचे आहे. मुलाला भेटण्यासाठी जायचे आहे. नवीन लग्न झाले म्हणून महाबळेश्वर किंवा इतर पर्याटनस्थळी हनिमूनला जायचे असल्याचे कारण सांगितले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी संयमित भूमिका निभावून पास नाकारल्याची माहिती आहे.

मंजूर केलेले अर्ज - २,३३७

नामंजूर अर्ज - १२,३८१

ई-पाससाठीचे अर्ज - १४,७१४

कोट

सबळ कारणाशिवाय ई-पास मंजूर करू नये, असे वरिष्ठांचे आदेश होते. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करून १२ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांचे अर्ज नाकरण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली.

नीलिमा आरज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विशेष शाखा)