शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

जनरेटर बदलविले, कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:06 IST

मानवी आयुष्यरेखा घटविणाºया जनरेटर वापरावर 'लोकमत'ने बुधवारच्या अंकातून प्रहार करताच जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीने काही तासांत ते जनरेटर बदलवून नवे अत्यल्प प्रदूषण करणारे जनरेटर आणले.

ठळक मुद्दे- तर अधिकारीही दोषी : तक्रार का नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्पच

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी आयुष्यरेखा घटविणाºया जनरेटर वापरावर 'लोकमत'ने बुधवारच्या अंकातून प्रहार करताच जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीने काही तासांत ते जनरेटर बदलवून नवे अत्यल्प प्रदूषण करणारे जनरेटर आणले.मुद्दा असा उपस्थित होतो की, जनरेटर बदलविले परंतु सतत अनेक दिवस वातावरणात वायू आणि ध्वनीप्रदूषण पसरविल्याच्या मुद्यावरून जेपीई कन्स्ट्रक्शन्स कंपनीविरुद्ध कारवाई केव्हा केली जाणार?विजेसाठी गरज भासल्यास जनरेटर वापरू शकण्यास करारांतर्गत मान्यता आहे; तथापि कामाच्या निमित्ताने प्रदूषण करण्यास कदापिही मान्यता नाही. तब्बल दोन वर्षे चालणाºया या सिंमेंट रस्ता निर्मितीच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अभियंत्यांची देखरेख आहे. ज्या अमरावती शहरात हे 'आदर्श' काम होत आहे तेथे मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे या सर्वच अधिकाºयांची कार्यालये आहेत. पाच जिल्ह््यांमधील वा जिल्हाभरातील कामांचे नियंत्रण आणि गुणवत्ता राखण्यासाठीच्या या तमाम अधिकाºयांच्या फौजेवरही नागरिकांच्या तोंडावर उडवावा तसाच जनरेटरच्या विषारी वायुचा धुराळा जेपीई कंपनी उडवित असेल, तर कुणावर कुणाचे नियंत्रण, असा प्रश्न निर्माण होतो.दीर्घकालीन आणि लक्षावधी नागरिकांशी संबंधित असलेले काम करताना त्याच्या अचूक नियोजनाची आखणी हे बांधकाम विभागाचे आद्य कर्तव्य असायला हवे. अमरावतीच्या बांधकाम खात्याला विशेष महत्त्व न देणाºया जेपीई कंपनीकडे नियोजन नाही. आश्चर्य असे की, उपअभियंत्यापासून तर मुख्य अभियंत्यापर्यंत कुणीही ते करवून घेण्याचे कर्तव्य बजावले नाही. कंत्राटदार कंपनीला वाटले म्हणून त्यांनी अवजड मशीन रस्त्यावर आणून ठेवले. काम न करताच दोन महिने वर्दळीचा मार्ग अडवून ठेवला. कंत्राटदाराला वाटले म्हणून विषारी वायू सोडणारे जनरेटर वापरणे सुरू केले. या तमाम प्रक्रियेवर कुण्याही अधिकाºयाने आक्षेप नोंदविला नाही.प्रदूषण कमी करणे हा शासनाचा महत्त्वपूर्ण अजेंडा आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रयत्नरत आहेत. येथे शासनाच्याच देखरेखीत अविश्वसनीयरीत्या प्रदूषण निर्माण केले जाते आणि तमाम अधिकारी त्यासाठी अनुकूल असतात, हे माहिती झाल्यास खुद्द पंतप्रधानही अचंबित होतील.जेपीई कंपनीने जाणीवपूर्वकरीत्या प्रदूषण पसरविले. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. या गंभीर मुद्याची दखल घेऊन मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे यांनी कंत्राटदार कंपनीला त्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश द्यायला हवे. समाधानकारक उत्तर न आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शहर पोलिसांत त्यासंबंधी तक्रार नोंदविणे हादेखील बांधकाम अधिकाºयांच्या कर्तव्याचा भाग ठरतो. तसे होणार नसेल तर संबंधित अधिकारीच या मुद्याला बळ देत असल्याची भावना जनमानसात निर्माण होईल. अधिकारी कारवाईच्या कक्षेत येतील.