शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरपंच अवॉर्डसाठी गावकारभारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:15 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ : दिमाखदार दुसरे पर्व, राज्यातील पहिलीच योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाऱ्या गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने गत वर्षापासून सुरु केला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच आदर्श सरपंच निवडून त्यांना गौरविण्यात आले़ यापूर्वी सरपंचांना गौरविणारी पुरस्कार योजना नव्हती.मागील वर्षी अठरा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. त्यात पाच हजाराहून अधिक सरपंचांनी सहभाग नोंदविला.सरपंचांनी त्यांच्या प्रस्तावात दिलेल्या कामांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्यात येऊन वेगवेगळ्या १३ कॅटेगरीमध्ये अगोदर जिल्हा व नंतर राज्य पातळीवर पुरस्कार देण्यात आले. गत २८ मार्चला मुंबईत राज्यस्तरावरील दिमाखदार सोहळ्यातग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विविध मंत्र्यांच्या हस्ते सरपंचांना गौरविले होते.गावांसाठी २५ लाखांची घोषणागत वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘सरपंच आॅफ द ईअर’ ठरलेल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त सरपंचांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास त्यांच्या ग्रामपंचायतला १० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती़जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींसाठीही विविध योजनांच्या घोषणा मंत्र्यांनी उत्स्फूर्तपणे केल्या होत्या.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत गतवर्षी ही योजना राबविण्यात आली. याहीवर्षी या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार पटकविण्यासाठी अनेक सरपंचांनी विविध योजना राबवत गतवर्षीपासूनच तयारी सुरु केली आहे.