शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वर्षभरात साकारणार गव्हाणकुंडचा सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:16 IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० मेगावॅटची उपलब्धी : २६ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.महानिर्मिती अंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स राहावेत, प्रत्यक्ष सौर वीज उत्पादनापासून वहनापर्यंतच्या विविध टप्प्यांवरील प्रशासकीय व तांत्रिक बाजूंवर सविस्तर चाचपणीसह प्रकल्पाची ई-निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून स्थापत्य स्वरूपाच्या कामांचा कार्यादेश कोराडीच्या स्थापत्य विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी २५ एप्रिल रोजी दिला. नागपूर विभागाचे मुख्य अभियंता (सौर) मिलिंद नातू यांच्या उपस्थितीत २६ एप्रिल रोजी गव्हाणकुंड येथे प्रत्यक्ष विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.प्रकल्पासाठी सुमारे ३० हेक्टर जागेच्या २० टक्के जमिनीचे समतोलीकरण, माती नमुने परीक्षण, माती परीक्षण अहवाल सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाºया विकसकाला डिझायनिंगकरिता पाठविण्यात आले. सोबतच २.५ किलोमीटरचा गव्हाणकुंड पोचरस्तादेखील पूर्ण करण्यात आला. प्राथमिक स्वरूपांच्या विकासकामांची प्राकलने यामध्ये सुरक्षा तार कुंपण, रस्ता कामे, नाल्यावरील पूल, उर्वरित जागेचे सपाटीकरण याबाबतचा पाठपुरावा कोराडी येथील स्थापत्य कार्यालयद्वारा मुंबई मुख्यालयाकडे सातत्याने करण्यात आल्याने कामाला गती मिळाली व आता प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी कामांना प्रारंभ झालेला आहे.मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, नियमित आढावामुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत असलेला हा सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यामुळे मुख्यमंत्री या प्रकल्पाचा नियमित आढावा घेतात. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. अनिल बोंडे यांचाही सतत पाठपुरावा असल्याने प्रकल्पाला गती आली. महानिर्मितीने राज्यभरातील विविध सौरऊर्जा प्रकल्प उभारणीकरिता नागपूर, नाशिक, औरंगाबाद व पुणे अशा चार प्रादेशिक विभागांकरिता मुख्य अभियंत्याची स्वतंत्र पदे निर्माण केलेली आहेत.वीज प्रकल्प उभारताना टप्पानिहाय कामांचे नियोजन करावे लागते. या प्रकल्पाची उभारणी व कार्यान्वयन कालावधी अठरा महिन्यांचा असला तरी प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.- विकास जयदेवसंचालक, महावितरण (प्रकल्प)