शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

आज घराघरात होणार गौरीचे आगमन

By admin | Updated: September 8, 2016 00:26 IST

गणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून...

तीन दिवस चैतन्यमयी वातावरण : पूजा-अर्चा, महानैवेद्य शुक्रवारी मोहन राऊत धामणगाव रेल्वेरूणुझुणत्या पाखराजा रे माझ्या माहेराआली गौराई अंगणी घाली लिंबलोण सडागणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून तीन दिवस या माहेरवाशिणी कुटुंबात सौख्य, समृद्धी व अखंड सौभाग्य प्राप्त करून देण्यासाठी घराघरात गौरीचे आगमन होत असून नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे़भाद्रपद महिन्याच्या मूळ नक्षत्रात तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो़ पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजा-अर्चा व तिसऱ्या दिवशी सौभाग्य लेणे देण्यात येते़ पौराणिक काळात कोलासूर नावाचा दुष्ट राक्षस स्त्रियांना अतिशय त्रास द्यायचा. सर्व स्त्रिया कंटाळून अखेर ब्रह्मा विष्णू, महेश यांच्याकडे गेल्या. तेव्हा परमेश्वराने कोलासूर राक्षसाचा नाश करण्याची जबाबदारी महालक्ष्मी देवीवर सोपविली. देवीने कोलासूर राक्षसाशी यु्द्ध करून त्यांचा वध केला़ व स्त्रियांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केले़, अशी आख्यायिका आहे़ गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे घरच्या सर्व भागात फिरविणे, प्रत्येक ठिकाणी रांगोळीची पाऊले रेखाटणे एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून गौराईचे पूजन करणे अशा पद्धतीने पूजन केले जाते. विदर्भात उभ्या महालक्ष्मींचे पूजन केले जाते. काही ठिकाणी नुसते मुखवटे तर काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर अनेक कुंटंूबात महालक्ष्मींना पितळी किंवा लाकडी तथा लोखंडी स्टँडवर उभ्या करतात़ काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर पितळेचे तसेच लाकडाचे असतात़ अनेक ठिकाणी हात नसण्याची सुद्धा पध्दत आहे़ दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधून दोघींच्यामध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात़ नवीन साड्या, नवीन मुकूट, गळ्यातील अलंकार, बागड्या, साड्यांचा असा सर्व नवा थाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते़ साड्या, गहू, तांदळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, समोर ठेवण्यात येत असले तरी पहिल्या दिवशी अशा समृद्धीने सजलेली महालक्ष्मी तथा गौरी ही भाजी व भाकरीच्या नैवद्याने तृप्त होते़ पहिल्या दिवशी जागरण करून रात्रील जागविल्या जातात. नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मींना बंद दार करून जेवण देण्यात येते़ अक्षरश: वाढलेल्या प्रसादात बोटांचे ठसे दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले़ या दिवशी आंबील व प्रसादाला अधिक महत्त्व असते़ तिसऱ्या दिवशी राशीचा प्रसाद या कुटूंबात मित्र परिवारांना देण्यात येतो.