शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आज घराघरात होणार गौरीचे आगमन

By admin | Updated: September 8, 2016 00:26 IST

गणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून...

तीन दिवस चैतन्यमयी वातावरण : पूजा-अर्चा, महानैवेद्य शुक्रवारी मोहन राऊत धामणगाव रेल्वेरूणुझुणत्या पाखराजा रे माझ्या माहेराआली गौराई अंगणी घाली लिंबलोण सडागणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून तीन दिवस या माहेरवाशिणी कुटुंबात सौख्य, समृद्धी व अखंड सौभाग्य प्राप्त करून देण्यासाठी घराघरात गौरीचे आगमन होत असून नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे़भाद्रपद महिन्याच्या मूळ नक्षत्रात तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो़ पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजा-अर्चा व तिसऱ्या दिवशी सौभाग्य लेणे देण्यात येते़ पौराणिक काळात कोलासूर नावाचा दुष्ट राक्षस स्त्रियांना अतिशय त्रास द्यायचा. सर्व स्त्रिया कंटाळून अखेर ब्रह्मा विष्णू, महेश यांच्याकडे गेल्या. तेव्हा परमेश्वराने कोलासूर राक्षसाचा नाश करण्याची जबाबदारी महालक्ष्मी देवीवर सोपविली. देवीने कोलासूर राक्षसाशी यु्द्ध करून त्यांचा वध केला़ व स्त्रियांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केले़, अशी आख्यायिका आहे़ गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे घरच्या सर्व भागात फिरविणे, प्रत्येक ठिकाणी रांगोळीची पाऊले रेखाटणे एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून गौराईचे पूजन करणे अशा पद्धतीने पूजन केले जाते. विदर्भात उभ्या महालक्ष्मींचे पूजन केले जाते. काही ठिकाणी नुसते मुखवटे तर काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर अनेक कुंटंूबात महालक्ष्मींना पितळी किंवा लाकडी तथा लोखंडी स्टँडवर उभ्या करतात़ काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर पितळेचे तसेच लाकडाचे असतात़ अनेक ठिकाणी हात नसण्याची सुद्धा पध्दत आहे़ दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधून दोघींच्यामध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात़ नवीन साड्या, नवीन मुकूट, गळ्यातील अलंकार, बागड्या, साड्यांचा असा सर्व नवा थाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते़ साड्या, गहू, तांदळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, समोर ठेवण्यात येत असले तरी पहिल्या दिवशी अशा समृद्धीने सजलेली महालक्ष्मी तथा गौरी ही भाजी व भाकरीच्या नैवद्याने तृप्त होते़ पहिल्या दिवशी जागरण करून रात्रील जागविल्या जातात. नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मींना बंद दार करून जेवण देण्यात येते़ अक्षरश: वाढलेल्या प्रसादात बोटांचे ठसे दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले़ या दिवशी आंबील व प्रसादाला अधिक महत्त्व असते़ तिसऱ्या दिवशी राशीचा प्रसाद या कुटूंबात मित्र परिवारांना देण्यात येतो.