शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सभा गुंडाळल्याने पेटले रण

By admin | Updated: September 4, 2016 00:18 IST

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण गुंडाळल्याने विरोधक व सत्ताधारी परस्पर आमने-सामने आल्याने शनिवारी ....

जिल्हा परिषद : विरोधी सदस्यांचा गोंधळ अमरावती : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण गुंडाळल्याने विरोधक व सत्ताधारी परस्पर आमने-सामने आल्याने शनिवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित सबागृहात गोंधळ उडाला. तीन महिन्यांनंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न करताच सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर मनमानी केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला आहे.सर्वधारण सभेच्या विषय सूचिप्रमाणे मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, कृषी विभागाच्या पीक संरक्षण योजनेच्या प्रस्तावास मान्यता देणे आदी विषयावर ही सभा बोलविण्यात आली होती. पीठासीन सभापती सतीश उईके यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेत वेळेवरच्या विषयावर कुठलीही चर्चा न करताच अध्यक्षांनी सभा आटोपल्याचे जाहीर करताच विरोधकांनी आक्रमक होऊन व्यासपीठासमोर गोंधळ घातला. अध्यक्ष साहेब आमच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा, असे ओरडत होते. मात्र याला न जुमानता ही सभा गुंडाळून सत्ताधाऱ्यांनी बहुमाताच्या जोरावर सोईचे विषय मंजूर केलेत. यात जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, तिवसा आणि नांदगाव खंडेश्र्वर या तीन तालुक्यांतील झेडपीच्या रस्ते विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यासाठी सभेत एकतर्फी मंजुरी देऊन एनओसीचा ठराव मंजूर केला. त्यामुळे विरोधक संप्तत झाले. सत्ताधाऱ्यांचा हा तोरा असाह्य झाल्याने विरोधी सदस्यांनी याबाबत सीईओंची भेट घेऊन चुकीचे व चर्चा न करता घेतलेले ठराव मान्य करू नये, अशी मागणी केली. यावेळी सन १९९६-९७ मध्ये लोखंड खरेदीसाठी घेतलेल्या अग्रीमचे समायोजनासाठी लेखा शीर्षकांचे पुनर्जिवनसाठी ९ लाख २५,२२५ रूपयांच्या तरतुदीस मंजुरी द्यावी या ठरावासह ११ विषयांवर चर्चा न करताच चुकीचे ठराव मंजूर केल्याचा आरोप सुधीर सूर्यवंशी, माजी अध्यक्ष तथा सदस्य सुरेखा ठाकरे, अभिजित ढेपे, सदाशिव खडके, मनोहर सुने, प्रमोद वाकोडे, चंद्रपाल तुरकाने आदींसह विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे. गदारोळात मात्र सदस्यांचे अनेक विषय सभा गुंडाळल्यामुळे भरकटले. यावेळी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, महेंद्रसिंह गैलवार, मोहन सिंगवी, मोहन पाटील, प्रवीण घुईखेडकर, सदाशिव खडके,बापुराव गायकवाड, ममता भांबुरकर, ज्योती आरेकर, उमेश केने, श्रीपाल पाल, मंदा गवई, आशिष धर्माळे तसेच सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कैलास घोडके, संजय इंगळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, खातेप्रमुख किशोर साकुरे, प्रमोद तलवारे, आनंद दासवत उपस्थित होते.(प्रतिनिधी)बालमूत्यू प्रकरणाची चौकशी टेंब्रुसोंडा प्रा.आ.केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे पाच महिन्यांत या केंद्रांतर्गत ३० बालकांचा व एक माता मृत्यू झाल्यावरसुद्धा आरोग्य यंत्रणेतर्फे तज्ज्ञ व कायमस्वरुपी डॉक्टरासह, पदाधिकाऱ्यांचे शेरे फाडून फेकणे, औषधी नसणे आदी संताप व्यक्त करणाऱ्या बाबी उघडकीस आल्यात.मात्र आरोग्य यंत्रणा का गप्प आहे. असा सवाल सदस्य वनमाला खडके यांनी झेडपी सभेत केला. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत आरोग्य विभागाने दखल घेऊन या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करूण या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सभागृहात सांगितले.झेडपी आमसभेत वेळेवर जे विषय माझ्या परवानगीने सभागृहात ठेवण्यात आले. त्यावर चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात आला. मात्र विरोधकांनी जे आरोप केले ते तथ्यहीन आहेत. - सतीश उईके ,अध्यक्ष, जिल्हा परिषदवेळेवरच्या विषयावर चर्चा न करताच नियबाह्य ठराव घेतले. जिल्ह्यातील रस्त्याची स्थिती खराब आहे,मात्र तीन तालुक्याला एनओसी देवून इतरावर अन्याय करणे ही बाब योग्य नाही.- सुरेखा ठाकरे,सदस्य, जि.प.विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेतील त्याचे आक्षेप असलेल्या मुद्यावर चर्चा केली. मात्र त्याबाबत लेखी काही कळविले नाही. तक्रार असल्यास त्याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल - किरण कुलकर्णी, मुख्यकार्यपालन अधिकारी