शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांच्या पूर्वसूचनेविना उघडले बेंबळा प्रकल्पाचे गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:20 IST

बेंबळा प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १२ जुलैच्या मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे काही गेट उघडण्यात आलेत. मात्र, याची पूर्वसूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आलेली नाही.

- गजानन मोहोड

अमरावती : बेंबळा प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १२ जुलैच्या मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे काही गेट उघडण्यात आलेत. मात्र, याची पूर्वसूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आलेली नाही. ही गंभीर व बेजबाबदारपणाची बाब असल्याने संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब विभागीय आयुक्तांनी गंभीरतेने घेतली. याविषयी आता जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चौकशी करून शासनाला अहवाल देणार आहेत. मागील आठवड्यात ११ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस व बेंबळा प्रकल्पाचे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. प्रकल्पातील जलसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने यवतमाळ सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता व नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यलय किंवा जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षास कोणतीही पूर्वसूचना न देता बेंबळा प्रकल्पाची १० गेट १२ जुलैच्या मध्यरात्री उघडली. यामुळे नदीपात्र अचानक दुथडी भरून वाहू लागले. सुदैवाने कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नसली तरी यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात न आल्यामुळे नागरिक बेसावध होते. ही बाब यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गंभीरतेने घेतली. अधीक्षक अभियंतासह यवतमाळ सिंचन मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच जिल्हाधिका-यांनी संबंधिताना १३ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिका-यांना विचारणा केल्यानंतर बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडण्यात आल्याची बाब उघडकीस आली. ही बाब अंत्यत गंभीर असून, संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच नदीकाठच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर चौकशी करणार आहेत.

अधीक्षक अभियंत्यांना माहीत होती बाबजिल्हाधिकारी राजेश देशमुख हे ११ जुलै रोजी स्वत: जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षात उपस्थित होते. अधीक्षक अभियंता यांना बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडल्याची बाब माहीत असतानासुद्धा त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षास याची कल्पना दिली नाही. १२ जुलै रोजी जिल्हाधिका-यांनी विचारणा केली केली असता त्यांनी प्रकल्पाची गेट उघडल्याचे मान्य केले. यावरून अधीक्षक अभियंता व त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांनी कामात हयगय केल्याची बाब स्पष्ट झाली.

जिल्हाधिका-यांशी यासंदर्भात संवाद झाला. ११ जुलै रोजी बेंबळा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १० गेट उघडण्यात आली. रात्रीच्या सुमारास धरणाची गेट उघडत नाहीत. याविषयीची सूचना जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात आलेली नव्हती. मात्र, याबाबत हूटर (सायरण) वाजविण्यात आला होता. कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.- रवींद्र लांडेकर,मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती