शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमाऐवजी कन्या शाळेत कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:59 IST

नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा : नगरपालिकेचा अजब गजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.नगरपालिकेच्या अखत्यारीतील शहरातील कन्या शाळेच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून एका हॉटेलमधील सांडपाणी येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे कन्या शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, यासाठी नगरपालिकेला विविध संघटनांच्यावतीने निवेदने देण्यात आली. विशेष म्हणजे, या शाळेमध्ये शहरातील चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात व सायंकाळच्या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, चिमुकले हे या शाळेच्या पटांगणात फेरफटका मारण्यासाठी, खेळण्यासाठी येत असतात. मात्र नगरपालिकेने ज्या ठिकाणी मुरूम टाकावा, त्याठिकाणी शहरातील नाल्यांमध्ये तीन ते चार वर्षांपूर्वी साचलेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण जिल्हाभरात अस्वच्छतेमुळे रोगराईचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया आदी आजारांनीही उसळी घेतली आहे. त्यामुळे नगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावून गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी मुरुमाची भरती टाकावी, जेणेकरून रोगराई ही पसरणार नाही, अशी मागणी दर्यापूरवासीयांनी केली आहे.कचरा कन्या शाळेच्या आवारात टाकण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पत्र दिले नाही वा ठराव मंजूर झालेला नाही. मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत.- अनिल बागळे, नगरसेवकराहत्या वस्तीमध्ये कचरा टाकल्यामुळे विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे हा कचरा शहराच्या बाहेर नेऊन टाकावा.- डॉ. गुंजन गुल्हानेशासकीय वैद्यकीय अधिकारीकन्या शाळेच्या पटांगणामध्ये सांडपाण्याने खड्डे पडले आहेत. तेथे ठिकाणी हा गाळ टाकण्यात येत आहे. यानंतर पुढील कार्यवाही होईल.- गीता वंजारीमुख्याधिकारी, नगरपालिका