शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

गंगाधर स्वामी मठातील नवसाला पावणारा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला ...

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा

नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा पंचक्रोशीत आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून या मठात गणेशोत्सव साजरा केला आहे. विसर्जन स्थळापासून मठापर्यंत दीड किलोमीटरचे नवसाचे लोटांगण प्रसिद्ध आहे.

मठाच्या स्थापनेची नोंद प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२ व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बालबस्व घेऊन येथे राहत असताना बालबस्व अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतित झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि बालबस्व धावत येऊन शरणाईला बिलगला. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा. तेव्हापासून या मठात श्रीगणेशाची स्थापना होऊ लागली, असे सांगितले जाते.

ज्या ठिकाणी शरणाईने श्रीगणेशाची स्थापना केली, त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते. या मातीवर ‘काशीखंड’ या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. त्यानंतर ती अमरावतीच्या मूर्तिकारांकडे पोहचवून मूर्ती घडविण्यात येते. सहा ते सात फूट उंचीची व परंपरागत स्वरूपाची मूर्ती कोरोनाच्या काळात चार फूट उंचीची बनविण्यात आली आहे.

मठातील गणेशोत्सवाला १०५८ वर्षांची परंपरा लाभली आहे. गंगाधर स्वामींच्या वेळी परिसरातून शंभर ते दीडशे दिंड्या गणेशोत्सवात सहभागी होत असत. काळ बदलला, परंतु उत्साह मात्र तोच आहे. तब्बल दहा दिवस चालणारा गणेशोत्सवादरम्यान भाविक व गावकऱ्यांसाठी अन्नदानाचे आयोजन केले जाते. सध्याचे मठाधिपती शिवशंकर शिवाचार्य स्वामी स्वतः पंगतीमध्ये फिरून भाविकांना काय हवे, काय नको, याची आस्थेने चौकशी करतात. दहा दिवस विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. मठातील आरतीला दररोज गावातील सर्वधर्मीय लोक उपस्थित राहत आहेत.

विसर्जन मिरवणूकही देखणी

मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्या वर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. येथील गणेश विसर्जन सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. अग्रभागी मठाचा गणपती असतो. मिरवणुकीत दिंड्या , ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक विषयांवरील देखावेदेखील सहभागी होतात. विसर्जनानंतर काही भाविक श्रीगुरू गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.