शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

गंगाधर स्वामी मठातील नवसाला पावणारा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला ...

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा

नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा पंचक्रोशीत आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून या मठात गणेशोत्सव साजरा केला आहे. विसर्जन स्थळापासून मठापर्यंत दीड किलोमीटरचे नवसाचे लोटांगण प्रसिद्ध आहे.

मठाच्या स्थापनेची नोंद प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२ व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बालबस्व घेऊन येथे राहत असताना बालबस्व अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतित झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि बालबस्व धावत येऊन शरणाईला बिलगला. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा. तेव्हापासून या मठात श्रीगणेशाची स्थापना होऊ लागली, असे सांगितले जाते.

ज्या ठिकाणी शरणाईने श्रीगणेशाची स्थापना केली, त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते. या मातीवर ‘काशीखंड’ या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. त्यानंतर ती अमरावतीच्या मूर्तिकारांकडे पोहचवून मूर्ती घडविण्यात येते. सहा ते सात फूट उंचीची व परंपरागत स्वरूपाची मूर्ती कोरोनाच्या काळात चार फूट उंचीची बनविण्यात आली आहे.

मठातील गणेशोत्सवाला १०५८ वर्षांची परंपरा लाभली आहे. गंगाधर स्वामींच्या वेळी परिसरातून शंभर ते दीडशे दिंड्या गणेशोत्सवात सहभागी होत असत. काळ बदलला, परंतु उत्साह मात्र तोच आहे. तब्बल दहा दिवस चालणारा गणेशोत्सवादरम्यान भाविक व गावकऱ्यांसाठी अन्नदानाचे आयोजन केले जाते. सध्याचे मठाधिपती शिवशंकर शिवाचार्य स्वामी स्वतः पंगतीमध्ये फिरून भाविकांना काय हवे, काय नको, याची आस्थेने चौकशी करतात. दहा दिवस विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. मठातील आरतीला दररोज गावातील सर्वधर्मीय लोक उपस्थित राहत आहेत.

विसर्जन मिरवणूकही देखणी

मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्या वर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. येथील गणेश विसर्जन सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. अग्रभागी मठाचा गणपती असतो. मिरवणुकीत दिंड्या , ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक विषयांवरील देखावेदेखील सहभागी होतात. विसर्जनानंतर काही भाविक श्रीगुरू गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.