शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांना पाजले शेवाळयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:46 IST

येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.

ठळक मुद्देमहापलिकेचा प्रताप : नागरिकांच्या आरोग्याला धोका, व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.दूषित पाणी असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हे बिंग फुटले. महापालिकेचा गलथान कारभार नागरिकांच्या जिवावर उठल्याचे हे चित्र बघून वाहतूक पोलिसांनी बारकाईने निरीक्षण हा प्रकार चव्हाट्यावर आला. हा प्रकार'लोकमत'ने आॅनलाईन व्हायरल करून लोकदरबारात मांडला. यावेळी एकीकडे गणपती बाप्पा मोऱ्याचा जयघोष होत असताना दुसरीकडे थकलेले नागरिक सदर पाण्याच्या कॅनमधुन आपली तृष्णा भागवित होते. काही नागरिकांनी पिण्याच्या बॅगची तपासणी केली असता . या मध्ये पाणी दूषित व कचरासुद्धा पाण्यात आढळून आला. येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्या कारणाने दूषित पाणी नागरिकांना पाजण्याचा गंभीर प्रकार हा महापालिकेच्या संबंधित विभागाकडून झाला. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. हा तर नागरिकांच्या आरोग्याशी शुद्ध खेळ असल्याची भावना जनमाणसांतून व्यक्त होत होती. शहरात अस्वच्छतेने सर्वत्र थैमान घातले आहे.तसेच मागील दोन महिन्यांत सर्वाधिक डेंग्यूचे व स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आता दूषित पाणी पोटात गेल्याने विविध प्रकारचे जलजन्य आजार सुध्दा होत आहेत. दूषित पाणी पिल्याने कावीळ, पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा नागरिकांच्या जिवीताशी खेळ तर नाही ना, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.ऐनवेळी बोलावल्या १०० कॅनछत्री तलावावर गणेश विसर्जनासाठी खड्डे खोदणे, बॅरीकेट्स लावणे, विसर्जनस्थळी सीसीटिव्ह कॅमेरे लावणे, निर्माल्य बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे असे नियोजन होते. परंतु, पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियंत्यानी ऐनवेळी १०० कॅनची व्यवस्था केली ही बाब पुढे आली आहे.संबंधितांवर कारवाई केव्हा?महापालिकेच्या एका शाखा अभियंता यांनी वेळेवर नागरिकांना पाणी पिण्यासाठी एका खासगी कॅन व्यावसायिकाला १०० कॅनची आर्डर दिली. त्यांनी या ठिकाणी व्यवस्था सुध्दा केली. पण, पाण्याच्या कॅनला शेवाळ लागली होती. व पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा असल्याने व सदर पाणी दूषित असल्याने ते नागरिकांच्या पोटात गेले यातून विविध जलजन्य आजारा होऊ शकतात.