शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

लालफीतशाहीत अडकले चिमुकल्यांचे भविष्य

By admin | Updated: October 3, 2015 00:15 IST

समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने महागड्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित करण्यात आले.

सोडतीचा दुसरा टप्पा कधी?: आरटीई, वंचित बालकांचे २५ टक्के प्रवेशलोकमत विशेषअमरावती : समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने महागड्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित करण्यात आले. मात्र आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतरही हे प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे उर्वरीत प्रवेश १५ सप्टेंबरपर्यंत निश्चित करावे, अशा सूचना शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र डेटलाईन संपून १५ दिवस उलटल्यानंतर सोडतीसाठी हवी असलेले संकेतस्थळ शासनाकडून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील चिमुकल्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.प्रि-प्रायमरीमध्ये २५ टक्के आरक्षण असावे की नाही यासाठी प्रचंड घोळ घालण्यात आला. शासन निर्णयाविरोधात इंग्रजी प्रि-प्रायमरी शाळांचे संचालक न्यायालयात गेले. पुन्हा सुधारित शासनादेश काढून प्रि-प्रायमरी अर्थात नर्सरी आणि केजी व पहिल्या वर्गात २५ टक्के आरक्षणाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेतय बराच कालावधी उलटून गेल्यानंतर आॅनलाईन अर्ज भरण्यासह प्रवेश प्रक्रिया राबविली गेली. मात्र अनेक ठिकाणी आॅनलाईन अर्ज भरत असताना संकेतस्थळ बंद पडले. या सर्व घडामोडीत प्रवेशाचा पहिला टप्पा कसातरी पार पडला.२५ टक्के आरक्षण अंतर्गत जिल्ह्यातील १९९ शाळांमधून प्रि-प्रायमरीमध्ये १०६४ तर पहिलीमध्ये २४६७ प्रवेश निश्चित करावयाचे होते. पहिल्या सोडतीत प्रि-प्रायमरीत २९७ आणि पहिलीत ५८९ प्रवेश निश्चित करण्यात आले व त्यांची शाळाही सुरू झाली. (प्रतिनिधी)सोडतीचा दुसरा टप्पा कधी?श्हरातील नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी जीवाचे रान केले. मात्र आॅनलाईन प्रक्रियेने अनेकांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. कुणाला योग्य शाळा मिळाली नाही तर कुणाला प्रवेश मिळाला नाही. २५ टक्के आरक्षणाखाली दुसऱ्या सोडतीत तरी पाल्यांचा नाव येईल, या अपेक्षेने पालक शिक्षण विभागाचा उंबरठा झिजवू लागले. मात्र हा टप्पा कधी राबविणार हे स्पष्ट झाले नाही. अमरावतीसह राज्यातील सर्वच ठिकाणी दुसरी सोडत काढून उर्वरीत बालकांचे प्रवेश निश्चित करावे, असा आदेश शिक्षण संचालकांनी काढला, त्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली. या निर्णयामुळे जिल्ह्यात प्रतीक्षा यादीत असलेल्या ४९० चिमुरड्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र आतापर्यंत आॅनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमून दिलेले संकेतस्थळच सुरू करण्यात आलेले नाही. संकेतस्थळ सुरू करण्यात न आल्याने शिक्षण संचालकांच्या आदेशाला काय अर्थ उरतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.संकेतस्थळ सुरू झालेले नाही. सुरू झाल्यास दुसरी सोडत काढून प्रवेश निश्चित करण्यात येईल.- किशोर पुरी, शिक्षण विस्तार अधिकारी,अमरावती.