शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 2, 2023 18:22 IST

Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

गजानन मोहोडअमरावती:  दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.गारपिटीने झाडाच्या सालीवर जखमा होतात. यामधून वेगवेगळ्या बुरशींचे संक्रमन होत आहे.

यामध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीफ्लोडीया, ऑलटरनारीया यासारख्या बुरशी जखमांमधून शिरकाव करीत असल्याने रोगाचा प्रसार होत आहे. यासोबतच झाडांच्या पानालादेखील मार लागल्याने पाने फाटून गळ होत आहे. त्यामुळे झाडाची सुर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावत आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबिया व लिंबूच्या हस्त बहराची फळगळ होत आहे.

जखमा भरुन निघाव्या व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी मोडलेल्या फांद्या आरीच्या सहाय्याने कापून घ्याव्या व कापलेल्या भागावर व बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. झाडाची साल फाटल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावे व जखमांवर बोर्डो पेस्ट लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास व मुळे उघडी पडली असल्यास बांबूच्या साहाय्याने उभी करण्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे अ. भा. समन्वयीत संशोधन प्रकल्पाने दिली.

टॅग्स :agricultureशेती