शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 2, 2023 18:22 IST

Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

गजानन मोहोडअमरावती:  दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.गारपिटीने झाडाच्या सालीवर जखमा होतात. यामधून वेगवेगळ्या बुरशींचे संक्रमन होत आहे.

यामध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीफ्लोडीया, ऑलटरनारीया यासारख्या बुरशी जखमांमधून शिरकाव करीत असल्याने रोगाचा प्रसार होत आहे. यासोबतच झाडांच्या पानालादेखील मार लागल्याने पाने फाटून गळ होत आहे. त्यामुळे झाडाची सुर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावत आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबिया व लिंबूच्या हस्त बहराची फळगळ होत आहे.

जखमा भरुन निघाव्या व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी मोडलेल्या फांद्या आरीच्या सहाय्याने कापून घ्याव्या व कापलेल्या भागावर व बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. झाडाची साल फाटल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावे व जखमांवर बोर्डो पेस्ट लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास व मुळे उघडी पडली असल्यास बांबूच्या साहाय्याने उभी करण्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे अ. भा. समन्वयीत संशोधन प्रकल्पाने दिली.

टॅग्स :agricultureशेती