शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 2, 2023 18:22 IST

Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

गजानन मोहोडअमरावती:  दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.गारपिटीने झाडाच्या सालीवर जखमा होतात. यामधून वेगवेगळ्या बुरशींचे संक्रमन होत आहे.

यामध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीफ्लोडीया, ऑलटरनारीया यासारख्या बुरशी जखमांमधून शिरकाव करीत असल्याने रोगाचा प्रसार होत आहे. यासोबतच झाडांच्या पानालादेखील मार लागल्याने पाने फाटून गळ होत आहे. त्यामुळे झाडाची सुर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावत आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबिया व लिंबूच्या हस्त बहराची फळगळ होत आहे.

जखमा भरुन निघाव्या व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी मोडलेल्या फांद्या आरीच्या सहाय्याने कापून घ्याव्या व कापलेल्या भागावर व बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. झाडाची साल फाटल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावे व जखमांवर बोर्डो पेस्ट लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास व मुळे उघडी पडली असल्यास बांबूच्या साहाय्याने उभी करण्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे अ. भा. समन्वयीत संशोधन प्रकल्पाने दिली.

टॅग्स :agricultureशेती