शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 2, 2023 18:22 IST

Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

गजानन मोहोडअमरावती:  दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.गारपिटीने झाडाच्या सालीवर जखमा होतात. यामधून वेगवेगळ्या बुरशींचे संक्रमन होत आहे.

यामध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीफ्लोडीया, ऑलटरनारीया यासारख्या बुरशी जखमांमधून शिरकाव करीत असल्याने रोगाचा प्रसार होत आहे. यासोबतच झाडांच्या पानालादेखील मार लागल्याने पाने फाटून गळ होत आहे. त्यामुळे झाडाची सुर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावत आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबिया व लिंबूच्या हस्त बहराची फळगळ होत आहे.

जखमा भरुन निघाव्या व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी मोडलेल्या फांद्या आरीच्या सहाय्याने कापून घ्याव्या व कापलेल्या भागावर व बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. झाडाची साल फाटल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावे व जखमांवर बोर्डो पेस्ट लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास व मुळे उघडी पडली असल्यास बांबूच्या साहाय्याने उभी करण्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे अ. भा. समन्वयीत संशोधन प्रकल्पाने दिली.

टॅग्स :agricultureशेती