शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

निधी आला विकासाला, बँकेत ठेवला व्याजाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST

अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगातून ९१ कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी अजूनही बँकेतच ...

अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगातून ९१ कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी अजूनही बँकेतच पडून आहे. यामागे अनेक कारणे आहेत. परंतु, हा निधी पाच वर्षे परत जाणार नसल्याने ग्रामपंचायतींना दिलासा मिळणार आहे. असे असले तरी यावर लाखो रुपयांचे व्याज जमा होणार आहे. यामुळे निधी आला विकासाला, बँकेत ठेवला व्याजाला, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत असे स्तर आहेत. अलीकडे या स्तरांपैकी ग्रामपंचायतीचा भाव वधारला आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी हा थेट गावांच्या खात्यात जात आहे. केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थेट सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यात जमा केला जात आहे. परिणामी विकासकामे करण्याची सरपंचांना मोठी संधी आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा सरपंच होणे बरे असे म्हटले जात आहे. ग्रामपंचायती निधीबाबत सक्षम बनत असताना, खर्च करण्याबाबत पिछाडीवर आहेत. ग्रामपंचायतीचे वार्षिक, पंचवार्षिक आराखडा दुरुस्त करता येऊ शकतो. परंतु, ही दुरुस्ती ग्रामसभेत मंजूर व्हावी लागते. पंचायत समिती शिफारस करून जिल्हा परिषद आराखडा दुरुस्तीवर शिक्कामोर्तब करते. या प्रत्येक टप्प्यावर राजकारण व दप्तरदिरंगाईचा अनुभव येतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्याचबरोबर यावर्षी कोरोनाही यासाठी आड आला आहे. एका ग्रामसेवकाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाही फटका बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात पंधराव्या वित्त आयोगातून गेल्या वर्षभरात दोन टप्प्यांत जवळपास ९१ कोटींहून अधिक रुपयांचा निधी मिळाला आहे. गत काही महिन्यात पंचेचाळीस कोटींहून अधिक रुपयांच्या निधीचे वेगवेगळे टप्पे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना, तर प्रत्येकी १० टक्के निधी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वाट्याला उपलब्ध झाला आहे. या उपलब्ध निधीतून लवकर विकासकामे करण्याची अपेक्षा ग्रामस्थांना आहे. मात्र, कोरोना व विविध अडचणींमुळे ग्रामपंचायतीचा निधी हा बँकेच्या खात्यात पडून आहे. त्यावर व्याज मिळत असल्याने ग्रामपंचायतींनाही फायदा होणार आहे. सदर निधी परत जाणार नसला तरी पाच वर्षात तो खर्च करणे अपेक्षित आहे.

बॉक्स

आराखड्याबाबत प्रशिक्षण पूर्ण

पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीचा वापर कसा करावा, आराखड्यात कोणती कामे घ्यावी, यासाठी शासन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांना प्रशिक्षण दिले जाते.