शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

रमाई घरकूल योजनेसाठी महापालिकेत निधीची वानवा

By admin | Updated: November 17, 2015 00:23 IST

रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.

हजारो लाभार्थ्यांचे प्रस्ताव : शासनाक डे २० कोटींची मागणीअमरावती : रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र घरकुलाचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थ्यांचे हजारो प्रस्ताव पडून आहेत. तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाने जुने अनुदान खर्च झाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. नवबौद्ध व अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाने ही योजना लागू करताना पहिल्या टप्प्यात विधवा, घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले आहे. दोन लाख रुपयातून घरकूल साकारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र लाभार्थी हे नवबौद्ध, अनुसूचित जाती समुहासोबत बीपीएल यादीत असणे अनिवार्य आहे. या अटी, शर्थी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच रमाई आवास योजनेचा लाभ दिल्या जात आहे. मात्र काही महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल लाभाचे प्रस्ताव येऊनही ते निधीमुळे मंजूर करता येत नाही, अशी माहिती आहे. प्राप्त प्रस्तावातून ४५० लाभार्थ्यांची यादी योग्यरित्या तपासून ती मंजुरीसाठी तयार आहे. या यादीला बैठकीत मान्यता मिळाली की, संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार आहे. यापूर्वी २१०० लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान देण्यात आले आहे. नव्याने १८५० घरकुलांचे प्रस्ताव वजा अर्ज महापालिकेत दाखल आहेत. अनुक्रमानुसार लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे, अशांना प्राधान्यक्रम दिले जाणार आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना अनुदान देऊन घरकुलाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. घरकूल लाभासाठी नवीन यंत्रणा नेमण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत घरकूल संदर्भात जागेची चाचपणी, कागदपत्र गोळा केली जात आहे. मात्र नवीन यंत्रणेमुळे घरकूल योजनेच्या कामाला खिळ बसल्याचा आरोप बहुतांश सदस्यांचा आहे. (प्रतिनिधी)अकोला महापालिके तून आठ कोटी अप्राप्तरमाई घरकूल योजनच्या अंमलबजावणीसाठी शासनाने अकोला महापालिकेला दिलेले आठ कोटी रुपये अखर्चिक आहेत. त्यामुळे हे आठ कोटी रुपये अनुदान अकोला महापालिकेने अमरावतीला वळती करावे, असे पत्र समाज कल्याण विभागाने अकोला महापालिकेला दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम अमरावती महापालिकेला मिळाली नसल्याची माहिती आहे. नवीन घरकुलांच्या प्रस्तावानुसार शासनाक डे २० कोटी रुपयांची मागणी महापालिकेने केली आहे.महापालिकेला आतापर्यंत ४० कोटी मिळालेघरकूल योजनेसाठी समाज कल्याण विभागाने अमरावती महापालिकेला आतापर्यंत ४० कोेटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यापैकी स्थानिक दस्तूरनगर शाखेतील देना बँकेच्या शाखेत ७ कोटी, ३६ लाख, ७८२ रुपये शिल्लक आहे. समाज कल्याण विभागाकडून उपयोगिता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही. तर दुसरीकडे रमाई घरकूल योजनेसाठी बँकेत अनुदान शिल्लक असताना ते जमा कशासाठी ठेवले जाते, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.घरकुलाचे आॅनलाईन १८५० अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी ४५० अर्जांची छाननी झाली आहे. अनुक्रमे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. निधी उपलब्ध असून मंजूर समितीची बैठक होताच प्रश्न मार्गी लागेल.- रवींद्र पवार, उपअभियंता, दलित वस्ती सुधार विभाग.