शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

पुनर्रचनेच्या शक्यतेमुळे सदस्यांना भरली धडकी

By admin | Updated: June 13, 2016 01:21 IST

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिल्याने तसेच तेथील लोकसंख्येत बदल झाल्याने निवडणूक आयोगाला

जिल्हा परिषद : निवडणुकीचे रोस्टर आॅगस्टमध्ये, समीकरण बदलणार जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिल्याने तसेच तेथील लोकसंख्येत बदल झाल्याने निवडणूक आयोगाला मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागणार आहे. मात्र, पुनर्रचना झाल्यास काय होणार? या विचाराने निवडणूक लढविण्यास इच्छूक जिल्हा परिषद सदस्यांना धडकी भरली आहे. नगर पंचायतींची रचना झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. मागील निवडणुकीत आॅगस्टमध्ये सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे यंदाही त्यावेळी आरक्षणावर निर्णय होऊ शकतो. राज्यातील २६ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले असल्याने आता स्थानिक सदस्यांचेही आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. जुलै किंवा आॅगस्टमध्ये सदस्यांच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती विराजमान होणार आहे. अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला जाते, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती झेडपीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. दरम्यान जि.प. सदस्यांनी आरक्षणाची पडताळणी सुरू केली आहे. पती-पत्नी पैकी कोणासाठी उमेदवारी मिळवायची, या राजकारणात काही जण आतापासूनच व्यस्त झाले आहेत. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५९ आहे. आता जिल्ह्यात धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली येथील ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ कमी होऊ शकतात, असा दावा सदस्यांनी केला आहे तर सन २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षणाची सोडत निघाल्यास वेगळी स्थिती उत्पन्न होऊ शकते, अशी शक्यता देखील काही लोक व्यक्त करीत आहेत. मात्र, आरक्षणाच्या पिटाऱ्यातून काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.