शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

मिरचीच्या नकली बियाण्याने केली शेतकऱ्यांची फसगत

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

तालुक्यात मिरची उत्पादकांची संख्या मोठी आहे. परंतु गतवर्षी कोकड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेताताील मिरची उखडून ...

लाखो रुपयांचे नुकसान : उत्पादकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार वरुड : तालुक्यात मिरची उत्पादकांची संख्या मोठी आहे. परंतु गतवर्षी कोकड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेताताील मिरची उखडून फेकण्याची वेळ आल्याने लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला होता. विषाणू प्रतिबंधक रोगमुक्त बियाणे असल्याची बतावणी दलालांनी करून शेतकऱ्यांच्या घशात घातली. मात्र, सदर बियाणे नकली निघाल्याने प्रतवारी आणि उत्पादनसुध्दा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. नकली बियाण्याच्या कंपनीविरुध्द मुख्यमंत्री यांचेकडे शेकडो शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केली आहे.काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकामध्येसुध्दा घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जातात. शेकडो क्विंटल मिरची राजुरा बाजारच्या प्रसिध्द मिरची बाजारामध्ये येते. परंतु कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीतून मिरचीची देवाणघेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ प्रसिध्द आहे. येथील मिरची ही दर्जेदार असल्याने परप्रांतीय बाजारपेठेतसुध्दा चांगली मागणी असते. येथून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्रबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, सौदी अरब राष्ट्रासह आदी देशांत येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केली जाते. वाहतूकदारांनासुध्दा चांगली संधी मिळते. या प्रसिध्द बाजारावरसुध्दा दिवसागणिक अवकळा येऊ लागली असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नकली बियाणे देऊन गंडविण्याचा प्रकार पेरणीच्या वेळी घडला. यावेळी मध्यप्रदेशात नोंदणीकृत असलेल्या एका कंपनीचे मिरची बियाणे महाराष्ट्रात विकणाऱ्या दलांलानी शेतकऱ्यांना विषाणूजन्य रोगप्रतिकारात्मक बियाणे असल्याची बतावणी केली. अनेक कृषिसेवा केंद्रातसुध्दा छुप्या मार्गाने विकण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना पावती मिळाली नाही. केवळ हाजरो रुपयांचे बियाणे देऊनही शेतकऱ्यांना पावती दिली नसली तरी विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सदर बियाणे नर्सरी तयार करुन रोपटे तयार केले. लागवडी अंती सदर बियाणे हे दुसऱ्या जातीचे असल्याचे असल्यामुळे प्रतवारी मिळत नाही. यामुळेच बाजारपेठेत सदर मिरच्यांना मागणी नसल्याने परवानाधारक व्यपाऱ्यांनीसुध्दा खरेदी करणे बंद केले. याचा परिणाम मिरची उत्पादक शेतकऱ्यावर झाला असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.