शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

डिसेंबरमध्ये थेट मोदींच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: September 2, 2016 00:13 IST

शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा...

बच्चू कडूंची घोषणा : अंबाड्यात जाहीरसभा, लक्षणीय उपस्थितीअंबाडा : शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा या मागणीसाठी ३१ डिसेंबर २०१६ ला गुजरातमधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा नेणार असल्याची घोषणा आ. बच्चू कडू यांनी येथे सोमवारी आयोजित जाहीरसभेत केली.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रवींद्र लकडे होते. यावेळी मंचावर माजी जि.प. सदस्य अनिल खांडेकर, धोटे, श्रीवास, मुरलीधर पिसे, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर कोकरे, हारुणभाई, उपसरपंच रेखा कोकरे, मंजुषा खांडेकर आदी उपस्थित होते.यावेळी समाजसेवक मुरलीधर पिसे यांचा सन २०१६ मध्ये शासनातर्फे घोषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघर्ष बहुउद्देशीेय संस्थतर्फे गौरव करण्यात आला. आ. बच्चू कडू पुढे म्हणाले की, भगवा, निळा आणि हिरव्या झेंड्याखाली राजकीय नेते शेतकऱ्यांची अडवणूक करतात. जातीधर्माचे राजकारण करून जातीधर्मात भांडणे लावतात. शेतकरी सुद्धा यात होरपळतो. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचत नाही. शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, असे स्वामीनाथन आयोगात सरकारने म्हटले आहे. पण कापसाला ४५०० रुपये भाव देवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाविरोधात लढ्या द्यावा, मी तुमच्या सोबत आहे, असेही आ. कडू म्हणाले. संचालन संतोष बिजवे यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी गजानन देशभ्रतार, राजू कोकरे, नितीन खोडस्कर, अनिल पठाण, दीपक घाटोळ यांनी प्रयत्न केले. या सभेला पसिरातील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. बच्चू कडूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.(वार्ताहर)