शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता ...

मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सदस्य तथा भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपजिल्हाधिकाऱ्यांना यावेळी लेखी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना अमलात आणली. ही योजना काही दिवसांनंतर जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेतली. काही वर्षांनंतर या योजनेला नियोजनाअभावी ग्रहण लागले. पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक थकीत झाल्यामुळे ही योजना बंद पडली. याकडे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्ट रोजी अमरावती येथील इर्विन चौकातून कमलसिंह चितोडिया व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांचा पैदल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तेथे कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ७० गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू होईल, असे आश्वासन दिले.