शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता ...

मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सदस्य तथा भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपजिल्हाधिकाऱ्यांना यावेळी लेखी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना अमलात आणली. ही योजना काही दिवसांनंतर जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेतली. काही वर्षांनंतर या योजनेला नियोजनाअभावी ग्रहण लागले. पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक थकीत झाल्यामुळे ही योजना बंद पडली. याकडे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्ट रोजी अमरावती येथील इर्विन चौकातून कमलसिंह चितोडिया व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांचा पैदल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तेथे कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ७० गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू होईल, असे आश्वासन दिले.