शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

जिल्ह्यात गाळमुक्त धरण उपक्रम

By admin | Updated: May 14, 2017 00:13 IST

जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे.

जिल्हाधिकारी : लोकसहभागातून सुधारणार जमिनीचा पोतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादन क्षमतेत वाढ होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.१०० हेक्टरच्या आत सिंचन क्षमता असणाऱ्या बंधाऱ्यामधून गाळ काढण्यासाठी ४८ तासांच्या आत संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांना कळवावे लागणार आहे. असे एकूण सिंचन विभागाचे ४४ व ईतर विभागाचे २३८ तलाव आहेत. तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पामधील गाळ काढण्यासाठी तीन दिवसपूर्व संबंधित अधिकाऱ्यांना गाळ काढण्यासाठी कळवावे लागणार आहे. मात्र गाळ काढताना १०० हेक्टर सिंचन क्षेत्रातील तलावाच्या भिंतीपासून ५ मीटर अंतरात व २५० मीटर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पाच्या भींतीपासून १० मीटर अंतरानंतर हा गाळ काढता येणार आहे. मात्र काही तलाव ईजीएसमधून तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मालकी हक्काचा वाद आहे. त्या ठिकाणी यंत्रणाद्वारा काळजी घेणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. मेळघाटात गाळ आहे. मात्र हे तलाव वनविभागाच्या अखत्यारित असल्याने येथील गाळ काढून वनजमिनीवरच टाकण्यात येणार आहे. या निमित्याने पानवठे पुनरूजिवीत करण्याचा प्रयत्न केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात ८.४९ लाख वृक्षलागवडीचा लक्ष्यांकजिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान ८ लाख ४९ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. लागवडीची प्रक्रिया शास्त्रोक्त व अत्याधुनिक पद्धतीची राहणार आहे. संबंधित जागेचे अंशास व रेखांश वनविभागाला देण्यात आले आहे. यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे खोदण्यात येणार आहे. शासकीय व खासगी नर्सरीतून रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. कृषी विभागाद्वारा प्रामुख्याने फळपिकांची लागवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.