शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गाळमुक्त धरण उपक्रम

By admin | Updated: May 14, 2017 00:13 IST

जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे.

जिल्हाधिकारी : लोकसहभागातून सुधारणार जमिनीचा पोतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादन क्षमतेत वाढ होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.१०० हेक्टरच्या आत सिंचन क्षमता असणाऱ्या बंधाऱ्यामधून गाळ काढण्यासाठी ४८ तासांच्या आत संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांना कळवावे लागणार आहे. असे एकूण सिंचन विभागाचे ४४ व ईतर विभागाचे २३८ तलाव आहेत. तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पामधील गाळ काढण्यासाठी तीन दिवसपूर्व संबंधित अधिकाऱ्यांना गाळ काढण्यासाठी कळवावे लागणार आहे. मात्र गाळ काढताना १०० हेक्टर सिंचन क्षेत्रातील तलावाच्या भिंतीपासून ५ मीटर अंतरात व २५० मीटर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पाच्या भींतीपासून १० मीटर अंतरानंतर हा गाळ काढता येणार आहे. मात्र काही तलाव ईजीएसमधून तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मालकी हक्काचा वाद आहे. त्या ठिकाणी यंत्रणाद्वारा काळजी घेणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. मेळघाटात गाळ आहे. मात्र हे तलाव वनविभागाच्या अखत्यारित असल्याने येथील गाळ काढून वनजमिनीवरच टाकण्यात येणार आहे. या निमित्याने पानवठे पुनरूजिवीत करण्याचा प्रयत्न केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात ८.४९ लाख वृक्षलागवडीचा लक्ष्यांकजिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान ८ लाख ४९ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. लागवडीची प्रक्रिया शास्त्रोक्त व अत्याधुनिक पद्धतीची राहणार आहे. संबंधित जागेचे अंशास व रेखांश वनविभागाला देण्यात आले आहे. यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे खोदण्यात येणार आहे. शासकीय व खासगी नर्सरीतून रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. कृषी विभागाद्वारा प्रामुख्याने फळपिकांची लागवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.