शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

पीएसआयची चौथ्यांदा बदली

By admin | Updated: June 12, 2017 00:21 IST

शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली.

वरिष्ठांकडे दाद : भंडारी प्रकरणाचा तपास काढलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली. गेल्या दहा महिन्यांत झालेली त्यांची ही चौथी बदली आहे. नवीनचंद्र भंडारीच्या महापालिकेतील बनवेगिरी प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडून काढण्यात आला. आपल्या या बदलीसत्रामागे पाणी मुरत असल्याची शंका लेवटकर यांनी उपस्थित केली आहे. लेवटकर यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहेत. मॅटसह मुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकापर्यंत तक्रार करून पोलीस विभागातील अशा घडामोडींची चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत. लेवटकर यांची प्रथम वलगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीने बदली करण्यात आली. तेथून त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली. तेथून त्यांना कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले व आता तर कोतवालीतून थेट भातकुली पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. लेवटकर यांच्याकडे महापालिकेतील भंडारी यांच्या बनवेगिरीच्या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यांच्या तपासकार्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने लेवटकर यांच्या हातातील तपासकार्य काढून टाकण्यात आल्यामुळे आता हे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे. आपल्या बदलीमागे राजकारण असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोतवालीतून बदली होण्यापूर्वी लेवटकर यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान ही बदली झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बदली अधिनियम २००५ नुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात येते. तथापि तीन वर्षांचा नियम डावलून आपली वर्षभरात चौथ्यांदा बदली का करण्यात आली, असा प्रश्न लेवटकर यांना पडला आहे. गुन्हे शाखेत फेरबदलाचा गुंता कायमगुन्हे शाखेतून बदली झालेले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पुन्हा पूर्व पदावर आले आहेत. या फेरबदलाविषयी पोलीस वर्तुळात घमासान चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अन्य ठाण्यांतील काही पोलीस बदल्यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत आहे.