शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चालकाचा अंदाज चुकल्याने चारचाकी नाल्यात कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी ...

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना

चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. ही घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील घडली.

गुरूवारी दुपारी १२.३० वाजतापासून चांदूर रेल्वे शहरासह ग्रामिण भागात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी - नाल्यांतील पाणी दुपारी तुडूंब वाहत होते. अशातच चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या पळसखेड मार्गावरील रेल्वे पुलाखाली व समोरील नाल्याच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अमरावती मधील चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोकं टवेरा गाडी क्र. एमएच २६ व्ही २२८५ ने अमरावती वरून वर्धा कडे चांदूर रेल्वे मार्गे जात होते. अशातच ते पळसखेड मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज खालून वर्धा बायपास कडे गेले होते. मात्र समोरील रस्ता बंद असल्यामुळे ते परत त्याच मार्गाने रेल्वे अंडरब्रिज कडे परत येत असतांना ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनी जवळील नाल्यामधील आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे नाल्याचा अंदाज न आल्याने टवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी पाण्यात डूबत असल्याचे लक्षात येताच पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व इतर काही मजुर धावून आले व त्यांनी गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा सर्व ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले व सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यानंतर पाण्यात अडकलेली गाडी सुरूवातीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीने गाडी न निघाल्याने क्रेन बोलाविण्यात आली. पाणी उतरल्यानंतर क्रेन च्या सहाय्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गाडी बाहेर काढण्यात आली.

‘ते’ ठरले देवदूत

जीवाची पर्वा न करता अडकलेल्या गाडीतील ६ लोकांचा जीव पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व मजुर यांनी वाचविला. ते वेळेवर पोहचल्याने सर्वांचा जीव वाचला त्यामुळे‘ते’ देवदूत ठरले आहे.