शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

चालकाचा अंदाज चुकल्याने चारचाकी नाल्यात कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी ...

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना

चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. ही घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील घडली.

गुरूवारी दुपारी १२.३० वाजतापासून चांदूर रेल्वे शहरासह ग्रामिण भागात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी - नाल्यांतील पाणी दुपारी तुडूंब वाहत होते. अशातच चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या पळसखेड मार्गावरील रेल्वे पुलाखाली व समोरील नाल्याच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अमरावती मधील चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोकं टवेरा गाडी क्र. एमएच २६ व्ही २२८५ ने अमरावती वरून वर्धा कडे चांदूर रेल्वे मार्गे जात होते. अशातच ते पळसखेड मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज खालून वर्धा बायपास कडे गेले होते. मात्र समोरील रस्ता बंद असल्यामुळे ते परत त्याच मार्गाने रेल्वे अंडरब्रिज कडे परत येत असतांना ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनी जवळील नाल्यामधील आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे नाल्याचा अंदाज न आल्याने टवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी पाण्यात डूबत असल्याचे लक्षात येताच पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व इतर काही मजुर धावून आले व त्यांनी गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा सर्व ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले व सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यानंतर पाण्यात अडकलेली गाडी सुरूवातीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीने गाडी न निघाल्याने क्रेन बोलाविण्यात आली. पाणी उतरल्यानंतर क्रेन च्या सहाय्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गाडी बाहेर काढण्यात आली.

‘ते’ ठरले देवदूत

जीवाची पर्वा न करता अडकलेल्या गाडीतील ६ लोकांचा जीव पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व मजुर यांनी वाचविला. ते वेळेवर पोहचल्याने सर्वांचा जीव वाचला त्यामुळे‘ते’ देवदूत ठरले आहे.