शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा अंदाज चुकल्याने चारचाकी नाल्यात कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी ...

अमरावतीमधील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे वाचले प्राण : पळसखेड मार्गावरील घटना

चांदूर रेल्वे : नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. ही घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील घडली.

गुरूवारी दुपारी १२.३० वाजतापासून चांदूर रेल्वे शहरासह ग्रामिण भागात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी - नाल्यांतील पाणी दुपारी तुडूंब वाहत होते. अशातच चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या पळसखेड मार्गावरील रेल्वे पुलाखाली व समोरील नाल्याच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अमरावती मधील चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोकं टवेरा गाडी क्र. एमएच २६ व्ही २२८५ ने अमरावती वरून वर्धा कडे चांदूर रेल्वे मार्गे जात होते. अशातच ते पळसखेड मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज खालून वर्धा बायपास कडे गेले होते. मात्र समोरील रस्ता बंद असल्यामुळे ते परत त्याच मार्गाने रेल्वे अंडरब्रिज कडे परत येत असतांना ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनी जवळील नाल्यामधील आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे नाल्याचा अंदाज न आल्याने टवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी पाण्यात डूबत असल्याचे लक्षात येताच पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व इतर काही मजुर धावून आले व त्यांनी गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा सर्व ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले व सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यानंतर पाण्यात अडकलेली गाडी सुरूवातीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीने गाडी न निघाल्याने क्रेन बोलाविण्यात आली. पाणी उतरल्यानंतर क्रेन च्या सहाय्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गाडी बाहेर काढण्यात आली.

‘ते’ ठरले देवदूत

जीवाची पर्वा न करता अडकलेल्या गाडीतील ६ लोकांचा जीव पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व मजुर यांनी वाचविला. ते वेळेवर पोहचल्याने सर्वांचा जीव वाचला त्यामुळे‘ते’ देवदूत ठरले आहे.