शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ग्राहकांना पाण्याचे चौपट बिल

By admin | Updated: January 14, 2017 00:14 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे.

जीवन प्राधिकरणची मनमानी : देयकांचे काम खासगी कंत्राटदाराकडे श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे. परिसरातील ग्राहकांना २० हजार रूपयांपर्यंतची बिले येत आहेत. अवाढव्य देयक भरायचे कसे या चिंतेने गोरगरीब जनता त्रस्त आहे. यामनमानी कारभाराकडे निवडणुकीच्या वर्दळीत कोणाचेही लक्ष नाही, हे विशेष. दोन ते तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असणारे पाणी देयकांचे काम प्राधिकरणाने खासगी कंपनीकडे सोपविले आहे. तेव्हापासूनच देयकांवर मीटर रिडिंगचे छायाचित्र देखिल छापून येत आहे. जेव्हापासून बिलांचे कामकाज खासगी कंपनीकडे गेले तेव्हापासून जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना पाण्याचे बिल अव्वाचे सव्वा येत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या ग्राहकांना अवघे पाचशे रूपये बिल येत होते त्या ग्राहकाला दोन महिन्यांपासून पाच हजार, दहा हजार ते २० हजार रुपयांपर्यंतचे देयक प्राप्त होत आहे. वाढीव बिले कमी करण्यासाठी बडनेरा शहरातील जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बडनेरा शहरात शेतकरी, गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अवाढव्य बिले पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मनपा निवडणुकांच्या घाईगर्दीने मात्र राजकारणी, इच्छुक उमेदवारांना यागंभीर मुद्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया त्रस्त ग्राहकांमध्ये उमटत आहेत. चौकशी करिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधिकरणचे कर्मचारी उलटसुलट माहिती देत आहेत. मीटरचे रीडिंग घेऊन येण्याच्या सूचना त्रस्त ग्राहकांना दिल्या जात आहेत. अव्वाच्या सव्वा बिलांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांत पाण्याचे दर वाढलेले नाहीत. मग इतके बिल कसे काय, एकूणच जीवन प्राधिकरणच्या भोंगळ कारभारावर शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाण्याच्या बिलांचे कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. बिलांवर मीटर रीडिंगचे छायाचित्रदेखील छापून येत आहे. बिले अधिक रकमेची येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लवकरच सुरळीत बिले प्राप्त होतील. चुकीची बिले दुरूस्त केली जात आहेत. ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण.खासगी कंत्राटदारांकडून बडनेरा शहरात मनमानी देयके दिली जात आहे. चुकीच्या बिलांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.- सिद्धार्थ बनसोड, सामाजिक कार्यकर्ता