शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ग्राहकांना पाण्याचे चौपट बिल

By admin | Updated: January 14, 2017 00:14 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे.

जीवन प्राधिकरणची मनमानी : देयकांचे काम खासगी कंत्राटदाराकडे श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे. परिसरातील ग्राहकांना २० हजार रूपयांपर्यंतची बिले येत आहेत. अवाढव्य देयक भरायचे कसे या चिंतेने गोरगरीब जनता त्रस्त आहे. यामनमानी कारभाराकडे निवडणुकीच्या वर्दळीत कोणाचेही लक्ष नाही, हे विशेष. दोन ते तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असणारे पाणी देयकांचे काम प्राधिकरणाने खासगी कंपनीकडे सोपविले आहे. तेव्हापासूनच देयकांवर मीटर रिडिंगचे छायाचित्र देखिल छापून येत आहे. जेव्हापासून बिलांचे कामकाज खासगी कंपनीकडे गेले तेव्हापासून जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना पाण्याचे बिल अव्वाचे सव्वा येत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या ग्राहकांना अवघे पाचशे रूपये बिल येत होते त्या ग्राहकाला दोन महिन्यांपासून पाच हजार, दहा हजार ते २० हजार रुपयांपर्यंतचे देयक प्राप्त होत आहे. वाढीव बिले कमी करण्यासाठी बडनेरा शहरातील जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बडनेरा शहरात शेतकरी, गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अवाढव्य बिले पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मनपा निवडणुकांच्या घाईगर्दीने मात्र राजकारणी, इच्छुक उमेदवारांना यागंभीर मुद्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया त्रस्त ग्राहकांमध्ये उमटत आहेत. चौकशी करिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधिकरणचे कर्मचारी उलटसुलट माहिती देत आहेत. मीटरचे रीडिंग घेऊन येण्याच्या सूचना त्रस्त ग्राहकांना दिल्या जात आहेत. अव्वाच्या सव्वा बिलांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांत पाण्याचे दर वाढलेले नाहीत. मग इतके बिल कसे काय, एकूणच जीवन प्राधिकरणच्या भोंगळ कारभारावर शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाण्याच्या बिलांचे कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. बिलांवर मीटर रीडिंगचे छायाचित्रदेखील छापून येत आहे. बिले अधिक रकमेची येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लवकरच सुरळीत बिले प्राप्त होतील. चुकीची बिले दुरूस्त केली जात आहेत. ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण.खासगी कंत्राटदारांकडून बडनेरा शहरात मनमानी देयके दिली जात आहे. चुकीच्या बिलांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.- सिद्धार्थ बनसोड, सामाजिक कार्यकर्ता