शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

वरुड तालुक्यातील चार पतसंस्था अवसायनात

By admin | Updated: September 3, 2015 00:10 IST

सहकार क्षेत्रात वरुड तालुका अग्रेसर असल्याने नागरी, बिगर शेती आणि कर्मचारी पतसंस्थांची संख्या येथे तब्बल ५५ आहे.

वरूड : सहकार क्षेत्रात वरुड तालुका अग्रेसर असल्याने नागरी, बिगर शेती आणि कर्मचारी पतसंस्थांची संख्या येथे तब्बल ५५ आहे. यातील नागरी पतसंस्थापैकी चार पतसंस्था अवसायानात निघाल्याने ठेवीदारांच्या लाखो रुपयाच्या ठेवी अडकल्या आहेत. काही पतसंस्था आॅक्सिजनवर असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. यामुळे ठेवीदारांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ठेवीदारांनी सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. मात्र, अद्यापही ठेवी मिळाल्या नाहीत, ही शोकांतिका आहे. सहकाराचा स्वाहाकार होत असताना असताना सहकार खाते मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुका सुखी आणि समृध्द तालुका म्हणून गणला जातो. येथे बागायतदारांची संख्या अधिक असल्याने हा भाग असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणू नावारूपास आला आहे. यामुळेच येथे नोंदणीकृत पतसंस्थांमध्ये २० कर्मचारी पतसंस्था, ११ बिगर शेती ग्रामीण पतसंस्था, २४ नागरी पतसंस्था आहे. पगारदार सभासदांच्या कर्मचारी पतसंस्था सुरळीत सुरु आहेत. तर बिगरशेती पतसंस्था व्यावसायिकांना कर्ज देत असल्याने त्या काहीशा सुस्थितीत आहे. मात्र, नागरी पतसंस्थामध्ये शेंदूरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था, समृध्दी नागरीक पतसंस्था, गाडगेबाबा नागरी सहकारी पतसंस्था तर वरुड येथील अर्बन क्रेडीट को-आॅप सोसायटी यांचा समावेश आहे. यामध्य ेलोकसेवा नागरी पतसंस्थेत १० लाख ८४ हजार रुपये ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, समृध्दी नागरी पतसंस्थेत १७ लाख ३३ हजार रुपयांच्या ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, गाडगेबाबा नागरी पतसंस्थेतून ठेवी किंवा कर्जवसुली नाही. तर वरूडच्या अर्बन क्रेडीट को-आॅप. सोसायटीमध्ये ठेविदारांचे १३ लाख ३३ हजार रूपये असून तेवढीच कर्जवसुली असल्याने ठेवीदारांच्या मुदती ठेवी अडकल्या आहेत. काही नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये जेमतेम कारभार सुरु असून त्या आॅक्सिजनवर आहेत. हितसंबंध जोपासणाऱ्या ठेविदारांना किस्तीने ठेवी परत करणे सुरू असले तरी गरजू ठेविदारांना रक्कम मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एका ठेविदाराने पतसंस्थेला याबाबत नोटीस दिली असता हा प्रकार उघडकीस आला. संस्थेत चकरा मारुनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पतसंस्थांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने ठेवीदार आणि खातेदारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार बिघडले आहेत.