शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वरुड तालुक्यातील चार पतसंस्था अवसायनात

By admin | Updated: September 3, 2015 00:10 IST

सहकार क्षेत्रात वरुड तालुका अग्रेसर असल्याने नागरी, बिगर शेती आणि कर्मचारी पतसंस्थांची संख्या येथे तब्बल ५५ आहे.

वरूड : सहकार क्षेत्रात वरुड तालुका अग्रेसर असल्याने नागरी, बिगर शेती आणि कर्मचारी पतसंस्थांची संख्या येथे तब्बल ५५ आहे. यातील नागरी पतसंस्थापैकी चार पतसंस्था अवसायानात निघाल्याने ठेवीदारांच्या लाखो रुपयाच्या ठेवी अडकल्या आहेत. काही पतसंस्था आॅक्सिजनवर असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. यामुळे ठेवीदारांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ठेवीदारांनी सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. मात्र, अद्यापही ठेवी मिळाल्या नाहीत, ही शोकांतिका आहे. सहकाराचा स्वाहाकार होत असताना असताना सहकार खाते मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुका सुखी आणि समृध्द तालुका म्हणून गणला जातो. येथे बागायतदारांची संख्या अधिक असल्याने हा भाग असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणू नावारूपास आला आहे. यामुळेच येथे नोंदणीकृत पतसंस्थांमध्ये २० कर्मचारी पतसंस्था, ११ बिगर शेती ग्रामीण पतसंस्था, २४ नागरी पतसंस्था आहे. पगारदार सभासदांच्या कर्मचारी पतसंस्था सुरळीत सुरु आहेत. तर बिगरशेती पतसंस्था व्यावसायिकांना कर्ज देत असल्याने त्या काहीशा सुस्थितीत आहे. मात्र, नागरी पतसंस्थामध्ये शेंदूरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था, समृध्दी नागरीक पतसंस्था, गाडगेबाबा नागरी सहकारी पतसंस्था तर वरुड येथील अर्बन क्रेडीट को-आॅप सोसायटी यांचा समावेश आहे. यामध्य ेलोकसेवा नागरी पतसंस्थेत १० लाख ८४ हजार रुपये ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, समृध्दी नागरी पतसंस्थेत १७ लाख ३३ हजार रुपयांच्या ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, गाडगेबाबा नागरी पतसंस्थेतून ठेवी किंवा कर्जवसुली नाही. तर वरूडच्या अर्बन क्रेडीट को-आॅप. सोसायटीमध्ये ठेविदारांचे १३ लाख ३३ हजार रूपये असून तेवढीच कर्जवसुली असल्याने ठेवीदारांच्या मुदती ठेवी अडकल्या आहेत. काही नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये जेमतेम कारभार सुरु असून त्या आॅक्सिजनवर आहेत. हितसंबंध जोपासणाऱ्या ठेविदारांना किस्तीने ठेवी परत करणे सुरू असले तरी गरजू ठेविदारांना रक्कम मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एका ठेविदाराने पतसंस्थेला याबाबत नोटीस दिली असता हा प्रकार उघडकीस आला. संस्थेत चकरा मारुनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पतसंस्थांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने ठेवीदार आणि खातेदारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार बिघडले आहेत.