शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

मुंबईमार्गे जाणाºया आणखी चार रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:59 IST

नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देरेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बुधवारी ३० आॅगस्ट रोजी या रेल्वे मार्गावरील वाहतुकीची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर धावणाºया अनेक गाड्यांना रद्दचा फटका बसला, तर काही गाड्या १४ ते १५ तास उशिरा धावल्यात, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्याने मुंबईकरांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशातच मंगळवारी दुरांतो एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईमार्गे जाणाºया गाड्या करण्यात आल्यात. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, कसारा नजीक अपघातग्रस्त रेल्वे मार्ग नव्याने उभारावा लागत असल्याने यास बराच विलंब लागणार, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे वाहतूक रात्री सुरूअमरावती : रेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- मुंबई शालीमार एक्स्प्रेस, तर मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस या दैनंदिन धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई- हावडा सुपर डिलक्स, कुर्ला- हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई- हावडा मेल १४ ते १५ तास उशिरा धावल्याची माहिती आहे. मात्र भुसावळ- नागपूर यादरम्यान पॅसेंजर गाड्या सुरळीतपणे धावत आहेत. पुणे- हावडा, अहमदाबाद- चैन्नई, भुसावळ- दिल्ली या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुंबईकडे जाणाºया गाड्या नियोजित वेळेत चालण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल, असे संकेत रेल्वे सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान मुंबईकडे जाणारा हा रेल्वे मार्ग बुधवारी उशिरा सुरु करण्यात आला आहे. काही गाड्या दुरुस्त झालेल्या या रेल्वे मार्गावरुन सोडण्यात आल्या आहेत. मुंबईकडे अंबा एक्स्प्रेस उशिरा धावल्याची माहिती आहे.मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्यांनाच रद्दचा फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अंबा एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असून ती बुधवारी साडेचार तास उशिरा धावली.- आर.टी.कोटांगळे,प्रबंधक, रेल्वे स्टेशन अमरावतीअमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्लमुंबईकडे जाणाºया अन्य रेल्वे गाड्या रद्द झाल्याने बुधवारी अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्ल धावली. अंबा एक्स्प्रेस २० डब्यांची आहे. अंबा एक्स्प्रेस बुधवारी सुमारे साडेचार तास उशिरा धावल्याने ती रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.