शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

मुंबईमार्गे जाणाºया आणखी चार रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:59 IST

नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देरेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बुधवारी ३० आॅगस्ट रोजी या रेल्वे मार्गावरील वाहतुकीची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर धावणाºया अनेक गाड्यांना रद्दचा फटका बसला, तर काही गाड्या १४ ते १५ तास उशिरा धावल्यात, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्याने मुंबईकरांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशातच मंगळवारी दुरांतो एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईमार्गे जाणाºया गाड्या करण्यात आल्यात. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, कसारा नजीक अपघातग्रस्त रेल्वे मार्ग नव्याने उभारावा लागत असल्याने यास बराच विलंब लागणार, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे वाहतूक रात्री सुरूअमरावती : रेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- मुंबई शालीमार एक्स्प्रेस, तर मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस या दैनंदिन धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई- हावडा सुपर डिलक्स, कुर्ला- हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई- हावडा मेल १४ ते १५ तास उशिरा धावल्याची माहिती आहे. मात्र भुसावळ- नागपूर यादरम्यान पॅसेंजर गाड्या सुरळीतपणे धावत आहेत. पुणे- हावडा, अहमदाबाद- चैन्नई, भुसावळ- दिल्ली या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुंबईकडे जाणाºया गाड्या नियोजित वेळेत चालण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल, असे संकेत रेल्वे सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान मुंबईकडे जाणारा हा रेल्वे मार्ग बुधवारी उशिरा सुरु करण्यात आला आहे. काही गाड्या दुरुस्त झालेल्या या रेल्वे मार्गावरुन सोडण्यात आल्या आहेत. मुंबईकडे अंबा एक्स्प्रेस उशिरा धावल्याची माहिती आहे.मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्यांनाच रद्दचा फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अंबा एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असून ती बुधवारी साडेचार तास उशिरा धावली.- आर.टी.कोटांगळे,प्रबंधक, रेल्वे स्टेशन अमरावतीअमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्लमुंबईकडे जाणाºया अन्य रेल्वे गाड्या रद्द झाल्याने बुधवारी अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्ल धावली. अंबा एक्स्प्रेस २० डब्यांची आहे. अंबा एक्स्प्रेस बुधवारी सुमारे साडेचार तास उशिरा धावल्याने ती रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.