शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

चार सदस्यीय प्रभाग प्रणालीला न्यायालयात आव्हान

By admin | Updated: June 1, 2016 00:51 IST

सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे.

विरोध वाढला : रिपाइं गट याचिका दाखल करणारअमरावती : सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे. तथापी ही प्रणाली उपेक्षित हिंदूच्या विरोधात असल्याचा आक्षेप नोंदवीत रिपाइं आठवले आणि आंबेडकर गटांकडून अध्यादेशातील तरतुदीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.महापालिकेच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडीचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. एका प्रभागातून दोन महिला व दोन पुरूष असे सूत्र आखले गेले आहे. तथापी या निर्णयाला रिपाइंचे खासदार रामदास आठवले आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. चार सदस्यीय पद्धतीचा निर्णय भाजप धार्जिणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याच्या पद्धतीमुळे राज्य आणि देशपातळीवरील राजकीय पक्षांना फायदा मिळू शकतो. अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो, असे राजकीय पक्षाच्या नेत्याचे मत आहे. या प्रार्श्वभूमीवर १९ मे रोजी काढलेल्या अध्यादेशातील महापालिके संदर्भातील तरतुदींना आव्हान देण्याचा निर्णय आठवले आणि आंबेडकर यांनी घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात रीट याचिका दाखल केली जाणार आहे. रिपाइं आठवले गटाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे व त्यांचे सहकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल करणार आहेत. १९९२ पासून सुरू असलेला वॉर्ड आणि प्रभागाचा हा खेळ बंद करावा, अशी जोरकस मागणी रिपाइं लावून धरणार आहे. एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास ते चारही उलट दिशेने राहतील आणि परिणामी वॉर्ड वाऱ्यावर सुटेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अध्यादेशाऐवजी कायदा करावा, अशी आग्रही मागणी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.चार सदस्यीय प्रभाग प्रणालीचा अध्यादेश धडकल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढीला लागली आहे. अपक्ष आणि स्थानिक स्तरावर आघाडी करून निवडणुका लढविणाऱ्यांवर तर या प्रणालीने तलवारच कोसळली आहे. त्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. रिपाइं गटासोबतच अन्य काही नगरसेवकही अध्यादेशातील महानगरपालिकेसंदर्भातील तरतुदीविरोधात आव्हान देणार आहे. (प्रतिनिधी)