शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारत निर्माण योजनेत चार लाखांचा अपहार

By admin | Updated: November 27, 2014 23:27 IST

येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे.

वाढोणा रामनाथ : येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे. पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वाढोणा रामनाथ येथे दरवर्षी पाणी टंचाईची भीषणता जाणवत होती. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ३२ लाख रूपयांची भारत निर्माण योजना अमलात आणली. योजनेंतर्गत गावात नळाची पाईपलाइन, नळ योजनेची विहीर आणि पाण्याची टाकी आदींचा समावेश होता. भारत निर्माणच्या संपूर्ण योजनेमध्ये शासनाकडून २७ लाख ५४ हजार ३२९ रूपये तीन टप्प्यात स्थानिक पाणीपुुरवठा समितीच्या बँक खात्यात जमा झाले होते. ३ लाख २२ हजार ३०० रूपये लोकवर्गणीसुद्धा समितीकडे जमा करण्यात आली, असे एकूण ३० लाख ७६ हजार ६२९ रूपये जमा झाले. प्रत्यक्षात २६ लाख ८० हजार ५०१ रूपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अमरावती यांनी तसा प्रत्यक्ष मूल्यांकन अहवाल सादर केला. त्यामुळे उर्वरित ३ लाख ९६ हजार १२८ रूपयांचा अपहार पाणीपुरवठा समितीने केल्याचा अहवाल जि.प.ने दिला. तो अहवाल जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १७ आॅक्टोबर रोजी स्थानिक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. पत्रामध्ये ३ लाख ९६ हजार १२८ रूपये अपहार योजनेमध्ये झाला आहे. तो त्वरित जिल्हा परिषद कार्यालयात भरणा करावा. अन्यथा समितीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. एकूण ३२ लाख रुपयांच्या योजनेतील ३० लाख ७६ हजार ६२९ रुपये प्रत्यक्षात पाणीपुरवठा समितीने खर्च दाखविला आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने न झाल्याने नागरिकांना आजही खड्डे खोदून पाणी काढावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)