शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

भारत निर्माण योजनेत चार लाखांचा अपहार

By admin | Updated: November 27, 2014 23:27 IST

येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे.

वाढोणा रामनाथ : येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे. पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वाढोणा रामनाथ येथे दरवर्षी पाणी टंचाईची भीषणता जाणवत होती. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ३२ लाख रूपयांची भारत निर्माण योजना अमलात आणली. योजनेंतर्गत गावात नळाची पाईपलाइन, नळ योजनेची विहीर आणि पाण्याची टाकी आदींचा समावेश होता. भारत निर्माणच्या संपूर्ण योजनेमध्ये शासनाकडून २७ लाख ५४ हजार ३२९ रूपये तीन टप्प्यात स्थानिक पाणीपुुरवठा समितीच्या बँक खात्यात जमा झाले होते. ३ लाख २२ हजार ३०० रूपये लोकवर्गणीसुद्धा समितीकडे जमा करण्यात आली, असे एकूण ३० लाख ७६ हजार ६२९ रूपये जमा झाले. प्रत्यक्षात २६ लाख ८० हजार ५०१ रूपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अमरावती यांनी तसा प्रत्यक्ष मूल्यांकन अहवाल सादर केला. त्यामुळे उर्वरित ३ लाख ९६ हजार १२८ रूपयांचा अपहार पाणीपुरवठा समितीने केल्याचा अहवाल जि.प.ने दिला. तो अहवाल जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १७ आॅक्टोबर रोजी स्थानिक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. पत्रामध्ये ३ लाख ९६ हजार १२८ रूपये अपहार योजनेमध्ये झाला आहे. तो त्वरित जिल्हा परिषद कार्यालयात भरणा करावा. अन्यथा समितीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. एकूण ३२ लाख रुपयांच्या योजनेतील ३० लाख ७६ हजार ६२९ रुपये प्रत्यक्षात पाणीपुरवठा समितीने खर्च दाखविला आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने न झाल्याने नागरिकांना आजही खड्डे खोदून पाणी काढावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)