शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

चार लाख क्विंटल तूर घरात पडून

By admin | Updated: May 2, 2017 00:37 IST

शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत.

दैना : शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोपअमरावती : शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत. मोजणीच्या प्रतीक्षेत महिन्याभरापासून यार्डात पडून असलेल्या अडीच लाख पोते तुरीची दैनावस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.गतवर्षीच्या खरिपात तुरीसाठी एक लाख १४ हजार ९९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली व समाधानकारक पाऊस असल्याने तुरीची सरासरी ११.५६ क्विंटल इतकीच उत्पादकता राहिली. म्हणजेच जिल्ह्यात १५.५० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. तुरीच्या हंगामापूर्वीच भाव कोसळले. तीन हजार रूपये क्विंटल याप्रमाणे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत नाफेडचे १० तूरखरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांजवळून कवडीमोल दराने खरेदी केलेल्या तुरीची केंद्रावर ५०५० रूपये हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावाआडून विक्री केली. विशेष म्हणजे बाजार समिती व खरेदी यंत्रणांच्या सहकार्याने शासनाला करोडो रूपयांचा चूना लावण्यात आला. शासनाला अखेर जाग आली. मात्र, तोवर व्यापारी तुरीची विक्री करून मोकळे झाले.या पार्श्वभूमिवर शासनाने २२ एप्रिलपासून सर्व तूर खरेदी केंद्र बंद केलेत. या दिनांकापर्यंत केंद्रावर नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर पडून आहे. यंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. तूर खरेदी केंद्र बंद व खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण ठरत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. (प्रतिनिधी)बाजार समितीत ११.२० लाख क्विंटल आवकधारणीसह जिल्ह्यातील १० बाजार समित्यांमध्ये केंद्र बंद होण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ११.२० लाख क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्याची तूर उत्पादकता १५.४१ लाख क्विंटल असल्याने किमान ४.३४ लाख क्विंटल तूर अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्र बंद झालीत. खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातली तूर देखील कवडीमोल भावाने जाणारयंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याने पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न व पेरणी कशी करावी याची विवंचना आहे. अशा स्थितीत भाववाढीच्या आशेने राखून ठेवलेली तूर देखील कवडीमोल भावाने विकली जाणार, अशी स्थिती आहे. बाजार समित्यांवर कारवाई कराबाजार समिती अधिनियम १९ अन्वये मार्केट यार्डात हमीपेक्षा कमी भावाने खरेदी होत असेल तर बाजार समितीने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना हमीदराने माल घेण्यास बाध्य करावे. मात्र, असे होत नसल्याने शासनाने कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीतच येतो उत्पादनाचा अंदाज, शासनाचे नियोजन चुकलेवास्तविकत: यंदा तुरीचे उत्पादन किती होणार याचा अंदाज तूर फुलोरावर असताना दिवाळीतच येतो. शेतकऱ्यांना हा अंदाज येऊ शकतो तर शासनाला का येत नाही, हा प्रश्न आहे. मुळात तुरीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यास व त्याचे नियोजन करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.