शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

चार लाख क्विंटल तूर घरात पडून

By admin | Updated: May 2, 2017 00:37 IST

शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत.

दैना : शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोपअमरावती : शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत. मोजणीच्या प्रतीक्षेत महिन्याभरापासून यार्डात पडून असलेल्या अडीच लाख पोते तुरीची दैनावस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.गतवर्षीच्या खरिपात तुरीसाठी एक लाख १४ हजार ९९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली व समाधानकारक पाऊस असल्याने तुरीची सरासरी ११.५६ क्विंटल इतकीच उत्पादकता राहिली. म्हणजेच जिल्ह्यात १५.५० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. तुरीच्या हंगामापूर्वीच भाव कोसळले. तीन हजार रूपये क्विंटल याप्रमाणे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत नाफेडचे १० तूरखरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांजवळून कवडीमोल दराने खरेदी केलेल्या तुरीची केंद्रावर ५०५० रूपये हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावाआडून विक्री केली. विशेष म्हणजे बाजार समिती व खरेदी यंत्रणांच्या सहकार्याने शासनाला करोडो रूपयांचा चूना लावण्यात आला. शासनाला अखेर जाग आली. मात्र, तोवर व्यापारी तुरीची विक्री करून मोकळे झाले.या पार्श्वभूमिवर शासनाने २२ एप्रिलपासून सर्व तूर खरेदी केंद्र बंद केलेत. या दिनांकापर्यंत केंद्रावर नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर पडून आहे. यंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. तूर खरेदी केंद्र बंद व खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण ठरत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. (प्रतिनिधी)बाजार समितीत ११.२० लाख क्विंटल आवकधारणीसह जिल्ह्यातील १० बाजार समित्यांमध्ये केंद्र बंद होण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ११.२० लाख क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्याची तूर उत्पादकता १५.४१ लाख क्विंटल असल्याने किमान ४.३४ लाख क्विंटल तूर अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्र बंद झालीत. खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातली तूर देखील कवडीमोल भावाने जाणारयंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याने पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न व पेरणी कशी करावी याची विवंचना आहे. अशा स्थितीत भाववाढीच्या आशेने राखून ठेवलेली तूर देखील कवडीमोल भावाने विकली जाणार, अशी स्थिती आहे. बाजार समित्यांवर कारवाई कराबाजार समिती अधिनियम १९ अन्वये मार्केट यार्डात हमीपेक्षा कमी भावाने खरेदी होत असेल तर बाजार समितीने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना हमीदराने माल घेण्यास बाध्य करावे. मात्र, असे होत नसल्याने शासनाने कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीतच येतो उत्पादनाचा अंदाज, शासनाचे नियोजन चुकलेवास्तविकत: यंदा तुरीचे उत्पादन किती होणार याचा अंदाज तूर फुलोरावर असताना दिवाळीतच येतो. शेतकऱ्यांना हा अंदाज येऊ शकतो तर शासनाला का येत नाही, हा प्रश्न आहे. मुळात तुरीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यास व त्याचे नियोजन करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.