शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

चार रिव्हॉल्व्हर्समधून झाला गोळीबार

By admin | Updated: November 25, 2014 22:47 IST

चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे

तक्रारीत उल्लेख : चांदणी चौकातील प्रकरण, आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रेही !संजय पंड्या - अमरावतीचांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे परस्परविरोधी तक्रारीत नमूद आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आपले तपासचक्र फिरविले आहे.स्थानिक चांदणी चौकात रविवारी झालेले गोळीबार प्रकरण दोन टोळीतील वर्चस्वाची लढाई मानली जात आहे. एकाच टोळीत असलेले शेख जफर व अहेफाज हे दोघेही विधानसभा निवडणुकीपासून विभक्त झाले आणि त्यांनी लहान-मोठ्या घटनांवरुन एकमेकांवर वर्चस्व स्ध्दि करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच लागलेली होती. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी नागपुरी गेट परिसरातील मतदान केंद्रावर हे दोन्ही गट आमने-सामने येताच प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतले होते. यात शेख जफरसह दुसऱ्या टोळीतील अहेफाजचाही समावेश होता.दरम्यान, रविवारी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला शेख नईम व साबीर खान यांच्यातील वाद मुख्य कारणीभूत मानला जात आहे. याप्रकरणी साबीर खानने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो ट्रक चालक आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या मित्रांसोबत तो बसलेला असताना शेख नईम तिथे आला व जुन्या वैमनस्यातून त्याने शिवीगाळ सुरु केली. तसेच साबीरचे वडील इतवारा बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनाही भेटून त्याने ‘तुमच्या मुलाला समजावून सांगा’, अशी धमकी दिली. रविवारी दुपारी २.३० वाजता साबीर खान हा चांदणी चौकात मोहम्मद अहेफाज व सलाउद्दीन यांच्यासोबत टपरीवर चहा घेत असता अचानक एम. एच. २७/३३३ ही स्कार्पिओ उर्दू असोसिएशन कार्यालयाजवळ येऊन धडकली. या वाहनातून १० ते १२ जण उतरले. यातील शेख जफर व श्याम मुंबईय्या या दोघांजवळ रिव्हॉल्वर व अन्य आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रे होती. यातील दोघांनी गोळीबार केल्याचा आरोप साबीर खान याने पोलीस तक्रारीतून केला आहे.दुसरीकडे शेख नईमने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो आपल्या वडीलांसोबत फळ विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी ११ वाजता तो औषधी खरेदी करण्यासाठी गेला असता तेव्हा साबीरचा सामना झाला. साबीरने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी १२ वाजता तो इलियासच्या पानटपरीवर गेला तेव्हा जावयाचा त्याला फोन आला.