शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

चार रिव्हॉल्व्हर्समधून झाला गोळीबार

By admin | Updated: November 25, 2014 22:47 IST

चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे

तक्रारीत उल्लेख : चांदणी चौकातील प्रकरण, आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रेही !संजय पंड्या - अमरावतीचांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे परस्परविरोधी तक्रारीत नमूद आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आपले तपासचक्र फिरविले आहे.स्थानिक चांदणी चौकात रविवारी झालेले गोळीबार प्रकरण दोन टोळीतील वर्चस्वाची लढाई मानली जात आहे. एकाच टोळीत असलेले शेख जफर व अहेफाज हे दोघेही विधानसभा निवडणुकीपासून विभक्त झाले आणि त्यांनी लहान-मोठ्या घटनांवरुन एकमेकांवर वर्चस्व स्ध्दि करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच लागलेली होती. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी नागपुरी गेट परिसरातील मतदान केंद्रावर हे दोन्ही गट आमने-सामने येताच प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतले होते. यात शेख जफरसह दुसऱ्या टोळीतील अहेफाजचाही समावेश होता.दरम्यान, रविवारी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला शेख नईम व साबीर खान यांच्यातील वाद मुख्य कारणीभूत मानला जात आहे. याप्रकरणी साबीर खानने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो ट्रक चालक आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या मित्रांसोबत तो बसलेला असताना शेख नईम तिथे आला व जुन्या वैमनस्यातून त्याने शिवीगाळ सुरु केली. तसेच साबीरचे वडील इतवारा बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनाही भेटून त्याने ‘तुमच्या मुलाला समजावून सांगा’, अशी धमकी दिली. रविवारी दुपारी २.३० वाजता साबीर खान हा चांदणी चौकात मोहम्मद अहेफाज व सलाउद्दीन यांच्यासोबत टपरीवर चहा घेत असता अचानक एम. एच. २७/३३३ ही स्कार्पिओ उर्दू असोसिएशन कार्यालयाजवळ येऊन धडकली. या वाहनातून १० ते १२ जण उतरले. यातील शेख जफर व श्याम मुंबईय्या या दोघांजवळ रिव्हॉल्वर व अन्य आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रे होती. यातील दोघांनी गोळीबार केल्याचा आरोप साबीर खान याने पोलीस तक्रारीतून केला आहे.दुसरीकडे शेख नईमने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो आपल्या वडीलांसोबत फळ विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी ११ वाजता तो औषधी खरेदी करण्यासाठी गेला असता तेव्हा साबीरचा सामना झाला. साबीरने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी १२ वाजता तो इलियासच्या पानटपरीवर गेला तेव्हा जावयाचा त्याला फोन आला.