शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार रिव्हॉल्व्हर्समधून झाला गोळीबार

By admin | Updated: November 25, 2014 22:47 IST

चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे

तक्रारीत उल्लेख : चांदणी चौकातील प्रकरण, आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रेही !संजय पंड्या - अमरावतीचांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे परस्परविरोधी तक्रारीत नमूद आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आपले तपासचक्र फिरविले आहे.स्थानिक चांदणी चौकात रविवारी झालेले गोळीबार प्रकरण दोन टोळीतील वर्चस्वाची लढाई मानली जात आहे. एकाच टोळीत असलेले शेख जफर व अहेफाज हे दोघेही विधानसभा निवडणुकीपासून विभक्त झाले आणि त्यांनी लहान-मोठ्या घटनांवरुन एकमेकांवर वर्चस्व स्ध्दि करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच लागलेली होती. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी नागपुरी गेट परिसरातील मतदान केंद्रावर हे दोन्ही गट आमने-सामने येताच प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतले होते. यात शेख जफरसह दुसऱ्या टोळीतील अहेफाजचाही समावेश होता.दरम्यान, रविवारी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला शेख नईम व साबीर खान यांच्यातील वाद मुख्य कारणीभूत मानला जात आहे. याप्रकरणी साबीर खानने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो ट्रक चालक आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या मित्रांसोबत तो बसलेला असताना शेख नईम तिथे आला व जुन्या वैमनस्यातून त्याने शिवीगाळ सुरु केली. तसेच साबीरचे वडील इतवारा बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनाही भेटून त्याने ‘तुमच्या मुलाला समजावून सांगा’, अशी धमकी दिली. रविवारी दुपारी २.३० वाजता साबीर खान हा चांदणी चौकात मोहम्मद अहेफाज व सलाउद्दीन यांच्यासोबत टपरीवर चहा घेत असता अचानक एम. एच. २७/३३३ ही स्कार्पिओ उर्दू असोसिएशन कार्यालयाजवळ येऊन धडकली. या वाहनातून १० ते १२ जण उतरले. यातील शेख जफर व श्याम मुंबईय्या या दोघांजवळ रिव्हॉल्वर व अन्य आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रे होती. यातील दोघांनी गोळीबार केल्याचा आरोप साबीर खान याने पोलीस तक्रारीतून केला आहे.दुसरीकडे शेख नईमने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो आपल्या वडीलांसोबत फळ विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी ११ वाजता तो औषधी खरेदी करण्यासाठी गेला असता तेव्हा साबीरचा सामना झाला. साबीरने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी १२ वाजता तो इलियासच्या पानटपरीवर गेला तेव्हा जावयाचा त्याला फोन आला.