शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:08 IST

सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते.

ठळक मुद्देधरणात ९४ टक्के साठा : शहानूर ६८, चंद्रभागा ७६, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के जलसाठा

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. शनिवारी पाण्याचा येवा वाढल्याने पूर्ण दुपारी २ वाजता चारही गेट १० सेंमीमिटरने उघडल्या गेलेत. शनिवारी सकाळी ७ वाजता धरण ९३.७७ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १० सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. सकाळी सव्वानऊच्या दरम्यान धरण ९४.२८ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १५ सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. धरणाऱ्या जलसाठ्यात वाढ होत गेल्यास दरवाजे आणखी उघडावे लागणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. सपन प्रकल्पस्थळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ४० एमएम पाऊस पडला. सायंकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत १२० एमएम पाऊस पडला. प्रकल्पस्थळी २४ तासांत ६५ एमएम तर कॅचमेन्ट क्षेत्रात १६० एमएम पावसाची नोंद आहे.परिसरात सतत पाऊस पडत असतानाही शुक्रवारला सायंकाळी ८.३० पर्यंत कुणीही अधिकारी प्रकल्पस्थळी उपस्थित नव्हते. केवळ दोन चौकीदार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सायंकाळी ८.३० च्या दरम्यान आवनकर नामक कनिष्ठ अभियंता प्रकल्पस्थळी पोहचलेत. तर यानंतर १० वाजताच्या दरम्यान उपविभागीय अभियंता इंदूरकर आणि हांडे दाखल झालेत. प्राप्त माहितीनुसार हे सर्व संबंधित अधिकारी अमरावतीला त्यावेळेस उपस्थित होते.गणपती विसर्जनाकरिता धरणातील पाणी सोडण्यात यावे याकरिता अचलपूर एसडीओ व्यंकट राठोड यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारलाच संपर्क साधला होता. दरम्यान सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढले आणि सपन प्रकल्प ९४ टक्के भरले. यात प्रकल्प अधिकाºयांनी दरवाजे उघडलेत आणि गणेश विसर्जनाकरिता पाणी उपलब्ध झाले. गणपती पावलेत, एसडीओ व्यंकट राठोड यांची इच्छा आपोआप पूर्णत्वास गेली.अचलपूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सपन प्रकल्पासह शहानूर धरण ६८ टक्के, तर चंद्रभागा धरण ७६ टक्के भरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प केवळ ५२ टक्केच भरले आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. धरण ९० टक्क्यांच्यावर भरतील तेव्हाच दरवाजे उघडण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.