शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:08 IST

सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते.

ठळक मुद्देधरणात ९४ टक्के साठा : शहानूर ६८, चंद्रभागा ७६, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के जलसाठा

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. शनिवारी पाण्याचा येवा वाढल्याने पूर्ण दुपारी २ वाजता चारही गेट १० सेंमीमिटरने उघडल्या गेलेत. शनिवारी सकाळी ७ वाजता धरण ९३.७७ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १० सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. सकाळी सव्वानऊच्या दरम्यान धरण ९४.२८ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १५ सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. धरणाऱ्या जलसाठ्यात वाढ होत गेल्यास दरवाजे आणखी उघडावे लागणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. सपन प्रकल्पस्थळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ४० एमएम पाऊस पडला. सायंकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत १२० एमएम पाऊस पडला. प्रकल्पस्थळी २४ तासांत ६५ एमएम तर कॅचमेन्ट क्षेत्रात १६० एमएम पावसाची नोंद आहे.परिसरात सतत पाऊस पडत असतानाही शुक्रवारला सायंकाळी ८.३० पर्यंत कुणीही अधिकारी प्रकल्पस्थळी उपस्थित नव्हते. केवळ दोन चौकीदार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सायंकाळी ८.३० च्या दरम्यान आवनकर नामक कनिष्ठ अभियंता प्रकल्पस्थळी पोहचलेत. तर यानंतर १० वाजताच्या दरम्यान उपविभागीय अभियंता इंदूरकर आणि हांडे दाखल झालेत. प्राप्त माहितीनुसार हे सर्व संबंधित अधिकारी अमरावतीला त्यावेळेस उपस्थित होते.गणपती विसर्जनाकरिता धरणातील पाणी सोडण्यात यावे याकरिता अचलपूर एसडीओ व्यंकट राठोड यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारलाच संपर्क साधला होता. दरम्यान सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढले आणि सपन प्रकल्प ९४ टक्के भरले. यात प्रकल्प अधिकाºयांनी दरवाजे उघडलेत आणि गणेश विसर्जनाकरिता पाणी उपलब्ध झाले. गणपती पावलेत, एसडीओ व्यंकट राठोड यांची इच्छा आपोआप पूर्णत्वास गेली.अचलपूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सपन प्रकल्पासह शहानूर धरण ६८ टक्के, तर चंद्रभागा धरण ७६ टक्के भरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प केवळ ५२ टक्केच भरले आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. धरण ९० टक्क्यांच्यावर भरतील तेव्हाच दरवाजे उघडण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.