शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

चार धरणांची दारे उघडली

By admin | Updated: August 3, 2016 23:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने ...

सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सार्वत्रिक, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील पाच पैकी चार प्रकल्पांची दारे बुधवारी उघडण्यात आलीत. नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील मुख्य उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४ दलघमी संकल्पित साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४८६.१८ दलघमी जलसाठा आहे. ही ८६.१९ टक्केवारी आहे. जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्प आहत. यापैकी शहानूर प्रकल्पांत संकल्पित ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पिय ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.०८ दलघमी साठा आहे. ही ६८.०७ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी साठ्याच्या तुलनेत २४.४५ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ६९.१३ टक्केवारी आहे.सर्वच तालुक्यांची सरासरी पारअमरावती : सपन प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.१४ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ७२.९० टक्केवारी आहे. जिल्ह्यात ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांत संकल्पित १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२५.१२ दलघमी साठा आहे. ही ६९.५७ टक्केवारी आहे. दरम्यान २४ तासांत १७.७ मिमी पाउस पडला. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस वरुड तालुक्यात पडला. अमरावती १७.२, भातकुली १६.४, नांदगांव ७.२, चांदूररेल्वे ३.२, धामणगांव रेल्वे ९, तिवसा ८.१, मोर्शी १६.४,अचलपूर २८.४, चांदूरबाजार २०,दर्यापूर ६.४, अंजनगांव ११, धारणी २५.४ व चिखलदरा तालुक्यांत ३५.४ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात १ जून ते २ आॅगस्ट या कालावधीत ४४३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६७५.८ मिमी पाऊस पडला. ही १५२.३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असली तरी मोर्शी, अचलपूर व दर्यापूर तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पावसाच्या टक्केवारीत चिखलदरा माघारले जिल्ह्यात सद्यस्थितीत १५२.३ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक १८टक्के पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला. अंजनगांव १८२, मोर्शी १२३, धारणी १६२, तिवसा १६१, अचलपूर १८०, अमरावती १४०, भातकुली १२६, नांदगांव १४२, चांदूररेल्वे १५८, धामणगांव १४५, वरुड येथे १११ टक्के पाऊस पडला. विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदऱ्यात फक्त १२४ मिमी पाऊस पडला. हा तालुका पावसाच्या टक्केवारीत जिल्ह्यात १३ व्या स्थानी आहे. धरणातून असा होत आहे विसर्ग उर्ध्व वर्धा धरणाचे तेराही दरवाजे बुधवारी सकाळी ८ वाजता ४० से.मी.ने उघडण्यात आले. या धरणातून ८२१ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. शहानूर प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे १२.२५ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे ६७.६९ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.