शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

चार धरणांची दारे उघडली

By admin | Updated: August 3, 2016 23:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने ...

सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सार्वत्रिक, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील पाच पैकी चार प्रकल्पांची दारे बुधवारी उघडण्यात आलीत. नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील मुख्य उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४ दलघमी संकल्पित साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४८६.१८ दलघमी जलसाठा आहे. ही ८६.१९ टक्केवारी आहे. जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्प आहत. यापैकी शहानूर प्रकल्पांत संकल्पित ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पिय ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.०८ दलघमी साठा आहे. ही ६८.०७ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी साठ्याच्या तुलनेत २४.४५ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ६९.१३ टक्केवारी आहे.सर्वच तालुक्यांची सरासरी पारअमरावती : सपन प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.१४ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ७२.९० टक्केवारी आहे. जिल्ह्यात ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांत संकल्पित १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२५.१२ दलघमी साठा आहे. ही ६९.५७ टक्केवारी आहे. दरम्यान २४ तासांत १७.७ मिमी पाउस पडला. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस वरुड तालुक्यात पडला. अमरावती १७.२, भातकुली १६.४, नांदगांव ७.२, चांदूररेल्वे ३.२, धामणगांव रेल्वे ९, तिवसा ८.१, मोर्शी १६.४,अचलपूर २८.४, चांदूरबाजार २०,दर्यापूर ६.४, अंजनगांव ११, धारणी २५.४ व चिखलदरा तालुक्यांत ३५.४ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात १ जून ते २ आॅगस्ट या कालावधीत ४४३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६७५.८ मिमी पाऊस पडला. ही १५२.३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असली तरी मोर्शी, अचलपूर व दर्यापूर तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पावसाच्या टक्केवारीत चिखलदरा माघारले जिल्ह्यात सद्यस्थितीत १५२.३ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक १८टक्के पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला. अंजनगांव १८२, मोर्शी १२३, धारणी १६२, तिवसा १६१, अचलपूर १८०, अमरावती १४०, भातकुली १२६, नांदगांव १४२, चांदूररेल्वे १५८, धामणगांव १४५, वरुड येथे १११ टक्के पाऊस पडला. विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदऱ्यात फक्त १२४ मिमी पाऊस पडला. हा तालुका पावसाच्या टक्केवारीत जिल्ह्यात १३ व्या स्थानी आहे. धरणातून असा होत आहे विसर्ग उर्ध्व वर्धा धरणाचे तेराही दरवाजे बुधवारी सकाळी ८ वाजता ४० से.मी.ने उघडण्यात आले. या धरणातून ८२१ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. शहानूर प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे १२.२५ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे ६७.६९ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.