शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चांदूर बाजारात कोरोनावर उपाययोजनांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देकार्यवाही शून्य : नागरिकांचा विनामास्क शहरात वावर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नसल्याने आजपासून चांदूरबाजार शहर व ग्रामीण भागातील व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली आहे. यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. मात्र नागरिकांनतर्फे मास्क न लावने तसेच फिजिकल डिस्टन्ससारख्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे संबंधित विभागाला कार्यवाहीची विसर पडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतर्फे वर्तविली जात आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रवासी ऑटोमध्ये ऑटोचालक विनामास्क, परवानगी पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.सध्या शेतात पेरणीच्या कामांमुळे अनेक नागरिक शहरात शेती साहित्य खरीदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. अशातच शहरातील अनेक नागरिक विनामास्क सर्रास वावरत आहेत. त्यांचावर पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. अनेक फळविक्रेते शासनाच्या कोणत्याच नियमाचे पालन करीत नसतानाही याविरुद्ध कार्यवाही करणारी यंत्रणा गायब झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला पालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाने शहरात दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर शहरात तीन कोरणा रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ६ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ६ दिवस सम-विषम पद्धतीने मार्केटमधील एक-एक लाईनमधील दुकाने खुली करण्यात आली. आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. यात सर्व शासकीय कार्यालये व इतर कार्यालय सुरू झाल्याने अमरावती शहरातील कर्मचाऱ्यांचे तसेच नागरिकांची अप-डाऊन करणाºयाची संख्या वाढत आहे. अशात अमरावती येथे कोरोनाने संपूर्ण शहरात जाळे पसरविले आहे. यात जिल्ह्यातून ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर कडू नये याकरिता नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणे गरजेचे वाटू लागले आहे. यावर लक्ष ठेवन्ण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करणेसुद्धा काळाची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतर्फे होत आहे.

टॅग्स :Marketबाजार