शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजारात कोरोनावर उपाययोजनांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देकार्यवाही शून्य : नागरिकांचा विनामास्क शहरात वावर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नसल्याने आजपासून चांदूरबाजार शहर व ग्रामीण भागातील व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली आहे. यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. मात्र नागरिकांनतर्फे मास्क न लावने तसेच फिजिकल डिस्टन्ससारख्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे संबंधित विभागाला कार्यवाहीची विसर पडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतर्फे वर्तविली जात आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रवासी ऑटोमध्ये ऑटोचालक विनामास्क, परवानगी पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.सध्या शेतात पेरणीच्या कामांमुळे अनेक नागरिक शहरात शेती साहित्य खरीदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. अशातच शहरातील अनेक नागरिक विनामास्क सर्रास वावरत आहेत. त्यांचावर पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. अनेक फळविक्रेते शासनाच्या कोणत्याच नियमाचे पालन करीत नसतानाही याविरुद्ध कार्यवाही करणारी यंत्रणा गायब झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला पालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाने शहरात दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर शहरात तीन कोरणा रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ६ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ६ दिवस सम-विषम पद्धतीने मार्केटमधील एक-एक लाईनमधील दुकाने खुली करण्यात आली. आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. यात सर्व शासकीय कार्यालये व इतर कार्यालय सुरू झाल्याने अमरावती शहरातील कर्मचाऱ्यांचे तसेच नागरिकांची अप-डाऊन करणाºयाची संख्या वाढत आहे. अशात अमरावती येथे कोरोनाने संपूर्ण शहरात जाळे पसरविले आहे. यात जिल्ह्यातून ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर कडू नये याकरिता नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणे गरजेचे वाटू लागले आहे. यावर लक्ष ठेवन्ण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करणेसुद्धा काळाची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतर्फे होत आहे.

टॅग्स :Marketबाजार