शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

लेखापरीक्षण नसल्यास अनुदान विसरा !

By admin | Updated: February 6, 2016 00:14 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नामध्ये वाढ करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामपंचायतींना निर्देश : ग्रामसेवकांवर जबाबदारी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ५० कोटी रुपयेअमरावती : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नामध्ये वाढ करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. लेखापरीक्षण झालेले लेखे आणि स्वउत्पन्न वाढविणाऱ्या ग्रामपंचायतींनाच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘परफॉर्मन्स ग्रँट’ मिळणार आहे. ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी देण्यात येणारे अनुदान ग्रामपंचायतस्तरावर उलब्ध करुन देण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सुमारे ५० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. २०१४-१५ चे लेखापरीक्षण आणि स्वउत्पन्न वाढविणे या दोन अटींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींनाच हे अनुदान मिळणार असल्याने लेखापरीक्षांकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायती धोक्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)लेखा परीक्षण आवश्यक१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार परफॉर्मन्स ग्रँट मिळण्याकरिता ग्रामपंचायतींनी त्यांचे लेखे ठेवलेले असणे आवश्यक असून त्यांचे अद्ययावत लेखा परीक्षण झालेले असावे. त्यांच्या उत्पन्नाचा सुस्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे. ही मुख्य अट आहे. ग्रामपंचायतीचे अचूक तसेच पूर्ण लेखे लेखापरीक्षणासाठी वेळेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची आहे. करआकारणी, वसुली बंधनकारकस्वउत्पन्नात वाढ करून आर्थिक स्थिती सुदृढ करण्याकरिता ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे आणि वसूल करणे बंधनकारक आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे. याशिवाय महसूल, मुद्रांक शुल्क, गौणखनिज यासारख्या शासनाकडून मिळणाऱ्या स्वउत्पन्नाबाबत ग्रामपंचायतींनी पाठपुरावा करावा, असे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना १४व्या आयोगाचा फायदायोजनेसाठी खर्च करताना प्रत्येक रुपयाचा पूर्ण मोबदला योजना ज्यांसाठी सुरू केली आहे त्यांना मिळणे व अशा तऱ्हेने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लाभ करुन देण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे व या निकषावरच ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातील निधीचा फायदा होईल, असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहे.