शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण नसल्यास अनुदान विसरा !

By admin | Updated: February 6, 2016 00:14 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नामध्ये वाढ करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामपंचायतींना निर्देश : ग्रामसेवकांवर जबाबदारी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ५० कोटी रुपयेअमरावती : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नामध्ये वाढ करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. लेखापरीक्षण झालेले लेखे आणि स्वउत्पन्न वाढविणाऱ्या ग्रामपंचायतींनाच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘परफॉर्मन्स ग्रँट’ मिळणार आहे. ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी देण्यात येणारे अनुदान ग्रामपंचायतस्तरावर उलब्ध करुन देण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सुमारे ५० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. २०१४-१५ चे लेखापरीक्षण आणि स्वउत्पन्न वाढविणे या दोन अटींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींनाच हे अनुदान मिळणार असल्याने लेखापरीक्षांकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायती धोक्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)लेखा परीक्षण आवश्यक१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार परफॉर्मन्स ग्रँट मिळण्याकरिता ग्रामपंचायतींनी त्यांचे लेखे ठेवलेले असणे आवश्यक असून त्यांचे अद्ययावत लेखा परीक्षण झालेले असावे. त्यांच्या उत्पन्नाचा सुस्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे. ही मुख्य अट आहे. ग्रामपंचायतीचे अचूक तसेच पूर्ण लेखे लेखापरीक्षणासाठी वेळेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची आहे. करआकारणी, वसुली बंधनकारकस्वउत्पन्नात वाढ करून आर्थिक स्थिती सुदृढ करण्याकरिता ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे आणि वसूल करणे बंधनकारक आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे. याशिवाय महसूल, मुद्रांक शुल्क, गौणखनिज यासारख्या शासनाकडून मिळणाऱ्या स्वउत्पन्नाबाबत ग्रामपंचायतींनी पाठपुरावा करावा, असे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना १४व्या आयोगाचा फायदायोजनेसाठी खर्च करताना प्रत्येक रुपयाचा पूर्ण मोबदला योजना ज्यांसाठी सुरू केली आहे त्यांना मिळणे व अशा तऱ्हेने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लाभ करुन देण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे व या निकषावरच ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातील निधीचा फायदा होईल, असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहे.