शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वनगुन्ह्यातील जप्त पोकलँड सरकारजमा करण्यास वनाधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

अनिल कडू परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करणाऱ्या वनगुन्ह्यात जप्त पोकलँडला सरकारजमा ...

अनिल कडू

परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करणाऱ्या वनगुन्ह्यात जप्त पोकलँडला सरकारजमा करण्यास सहायक वनसंरक्षकांनी नकार दिला आहे.

अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात हा गुन्हा घडला. वनविभागाची परवानगी न घेता राखीव वनात पोकलँडद्वारे अवैध उत्खनन करून संबंधितांनी ट्रकद्वारे गाळ व मुरमाची अवैध वाहतूक केल्याचे मुरुमाचे (वनउत्पादन) उत्खनन करून नैसर्गिक नाल्यांमध्ये टाकून नाल्यात अडथळा निर्माण केल्याचे सहायक वनसंरक्षकांना मान्य आहे. मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा येथील वनसर्व्हेअर आणि वनपरिक्षेत्राधिकारी अंजनगाव यांच्यासह संबंधित वनरक्षक व वनपालाचे स्पष्ट अहवालही आहेत. यात प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदारही आहेत. तरीदेखील जप्त पोकलँडद्वारे राज्य शासनाची मालमत्ता असलेल्या इमारती लाकूड, चंदन लाकूड, जळाऊ लाकूड, कोळसा किंवा इतर अधिसूचित वन उत्पादनाबाबत वनगुन्हा घडलेला नाही, असे नमूद करून जप्त पोकलँड सरकारजमा करण्याबाबतचा वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव यांचा अर्ज, २८ जुलै २०२१ ला सहायक वनसंरक्षकांनी फेटाळला. असे करताना जैवविविधता कायद्याचा मात्र त्यांना विसर पडला. सहायक वनसंरक्षकांनी पारित केलेला हा आदेश सध्या वनविभागांतर्गत चर्चेत आहे. व्हाॅट्सॲप ग्रुपवरही तो बऱ्यापैकी व्हायरल होत आहे.

बॉक्स

असा घडला वनगुन्हा

संबंधितांनी राखीव नातील सर्वे क्रमांक ०५ मधील सावरपाणी धरणातून वनउत्पादनाचे पोकलँड मशिनच्या साह्याने अवैधरीत्या उत्खनन केले. विनापरवानगी राखीव वनखंड क्रमांक १०६५ आणि १०६६ मध्ये नवीन रस्ता तयार केला. वन उत्पादनाची वनाबाहेर वाहतूक केली. यावरून २१ एप्रिल २०२१ रोजी वनगुन्हा नोंदविल्या गेला.

--

परवानगी आधीच सर्व काही

१७ एप्रिल २०२१ ला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मोका स्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांना परवानगी आधीच सावरपाणी धरणातून गाळ, मातीची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. याकरिता नवीन कच्चा रस्ता तयार केल्याचेही त्यांना आढळून आले. सदर उत्खनन केलेले ठिकाण व नवीन कच्चा रस्ता तयार केलेले ठिकाण हे वनजमीन असल्याचे ही त्यांचे निदर्शनास आले.

--

राखीव वनात घडला गुन्हा

वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव आणि वनविभागाच्या विभागीय कार्यालयातील वनसर्व्हेअर व वनकर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी परत घटनास्थळी जाऊन तपासणी केली. उत्खनन झालेले ठिकाण हे चिंचोना नियत क्षेत्रातील सर्वे क्रमांक ०५ मधील राखीव वनात झाल्याचे तपासणीत त्यांना आढळून आले. नवीन तयार केलेला कच्चा रस्ता सावरपाणी नियतक्षेत्रातील वनखंड १०६५ व १०६६ मधील राखीव वनात तयार केल्याचेही आढळले.