शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

अतिक्रमणाकडे अक्षम्य दुर्लक्ष, जंगलाची सुरक्षा धोक्यात परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा आहे. यामुळे जंगलाची सुरक्षा धोक्यात आली ...

अतिक्रमणाकडे अक्षम्य दुर्लक्ष, जंगलाची सुरक्षा धोक्यात

परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा आहे. यामुळे जंगलाची सुरक्षा धोक्यात आली आहे. वनरक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. कर्तव्यावर असलेल्यांकडे अतिरिक्त भार सोपविण्याचा सपाटा वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे.

वनरक्षकाला जंगलात गस्त घालताना वनमजूर आवश्यक ठरतो. वनरक्षकांकडून वनमजुरांची मागणी वारंवार केली जात आहे. पण, या मागणीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. यासाठी खर्चाचा मुद्दा पुढे केला जात आहे. यादरम्यान जंगलाच्या सुरक्षिततेपेक्षा मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या बंगला दुरुस्तीवर, नूतनीकरनावरच अधिक खर्च होत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

अंजनगाव वनपरिक्षेत्र हे संवेदनशील आहे. यावर लक्ष ठेवण्याकरिता आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग वरिष्ठांकडून दिला जात जात नाही. यामुळे जंगल वाऱ्यावर आहे. अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनाई असतानाही राजरोस मेंढ्यांची अवैध चराई जंगलात सुरू आहे. या वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीतून गोळा केलेले सागवान लाकूड अंजनगाव, कारला, पणज, अकोट, अकोला येथे वाहनांमध्ये भरून पाठविले जात आहे. अंजनगाव-दर्यापूर मार्गे अमरावती, अकोला, हैदराबादपर्यंत हे लाकूड पोहोचले आहे, याची माहिती वनअधिकाऱ्यांना आहे.ॉ

उपाययोजना नाहीत

काही वर्षांपासून लाकूडतोड राजरोसपणे सुरू आहे. असे असतानाही या अनुषंगाने कुठल्याही ठोस उपाययोजना मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडाकडून केल्या जात नाहीत. अवैधरित्या तोडल्या गेलेले सागवान लाकूड गोळा करण्याची निर्धारित ठिकाणे जंगल क्षेत्रातच आहेत. वेळप्रसंगी ते हे लाकूड नाल्यातही गोळा करतात आणि तेथून वन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ते ट्रॅक्टर किंवा लहान ट्रकमध्ये भरून लाकूड तस्कर घेऊन जातात.

शेकडो हेक्टरमध्ये अतिक्रमण

अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकर्त्यांनी वृक्षतोड करून शेकडो हेक्टरवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाच्या अनुषंगाने वनगुन्हेही दाखल आहेत. अतिक्रमण होऊ नये आणि झालेले अतिक्रमण काढल्या जावे, निरस्त केल्या जावे, याकरिता मेळघाट प्रादेशिक वनविभागात स्वतंत्र असे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कार्यरत आहे. तरीसुद्धा अंजनगाव वनपरिक्षेत्रात दर वर्षी अतिक्रमणाच्या घटना घडत असून अतिक्रमण वाढत आहे.