शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनविभागाचा चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

कॉमन /गणेश वासनिक अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ ...

कॉमन /गणेश वासनिक

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ फार्स ठरली. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अहवाल सादर करू शकली नाही. दुसरीकडे आराेपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हे जामिनावर सुटून मुक्त झाले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनबलप्रमुख पी. साईप्रसाद यांनी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यासाठी वनविभागाकडून नऊ सदस्यीय समितीचे गठन केले होते. या समितीला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, आता चार महिने लोटूनही वनविभागाची समिती अहवाल सादर करू शकली नाही. याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे वनखात्याची समिती गठित करणे हा केवळ फार्स आहे, असा आक्षेप आता खरा ठरू लागला आहे. अहवाल सादर न करणे म्हणजे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते.

---------------------

अशी होती वनविभागाची चौकशी समिती

समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या डीएफओ अधिकारी पीयूषा जगताप, एसीएफ ज्योती पवार, आरएफओ विजया कोकाटे, सेवानिवृत्त डीएफओ किशोर मिस्त्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांचा समावेश आहे. या समितीच्या तीन उपसमिती गठित करण्यात आल्या होत्या.

-----------

आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचा महिनाभरातच अहवाल सादर

राज्य शासनाने गठित केलेल्या आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्या नेतृत्वातील समितीने महिनाभरातच शासनाकडे अहवाल सादर केला आहे. सरवदे यांनी मुंबईहून अमरावती गाठले. त्यानंतर हरिसाल येथे घटनास्थळी भेट दिली. दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांची साक्ष नोंदविली. दरम्यान काही वनाधिकारी, कर्मचाऱ्यांशी भेटी घेतल्या. वास्तव जाणून घेतल्यानंतर अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते, हे विशेष. मात्र, चार महिने झाल्यानंतरही वनविभागाची समिती साधा अहवालदेखील सादर करू शकली नाही, हे आश्चर्य आहे.