शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनविभागाचा चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

कॉमन /गणेश वासनिक अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ ...

कॉमन /गणेश वासनिक

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ फार्स ठरली. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अहवाल सादर करू शकली नाही. दुसरीकडे आराेपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हे जामिनावर सुटून मुक्त झाले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनबलप्रमुख पी. साईप्रसाद यांनी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यासाठी वनविभागाकडून नऊ सदस्यीय समितीचे गठन केले होते. या समितीला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, आता चार महिने लोटूनही वनविभागाची समिती अहवाल सादर करू शकली नाही. याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे वनखात्याची समिती गठित करणे हा केवळ फार्स आहे, असा आक्षेप आता खरा ठरू लागला आहे. अहवाल सादर न करणे म्हणजे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते.

---------------------

अशी होती वनविभागाची चौकशी समिती

समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या डीएफओ अधिकारी पीयूषा जगताप, एसीएफ ज्योती पवार, आरएफओ विजया कोकाटे, सेवानिवृत्त डीएफओ किशोर मिस्त्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांचा समावेश आहे. या समितीच्या तीन उपसमिती गठित करण्यात आल्या होत्या.

-----------

आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचा महिनाभरातच अहवाल सादर

राज्य शासनाने गठित केलेल्या आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्या नेतृत्वातील समितीने महिनाभरातच शासनाकडे अहवाल सादर केला आहे. सरवदे यांनी मुंबईहून अमरावती गाठले. त्यानंतर हरिसाल येथे घटनास्थळी भेट दिली. दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांची साक्ष नोंदविली. दरम्यान काही वनाधिकारी, कर्मचाऱ्यांशी भेटी घेतल्या. वास्तव जाणून घेतल्यानंतर अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते, हे विशेष. मात्र, चार महिने झाल्यानंतरही वनविभागाची समिती साधा अहवालदेखील सादर करू शकली नाही, हे आश्चर्य आहे.