शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

जिल्ह्याच्या २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा मूूलमंत्र दिला आहे. जिल्ह्याच्या सुदैवाने येथे एकूण २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र आहे. महेंद्री ...

अमरावती : कोरोनाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा मूूलमंत्र दिला आहे. जिल्ह्याच्या सुदैवाने येथे एकूण २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र आहे. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल. शनिवारी असलेल्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अमरावतीकरांनी बुलंद केली आहे.

अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ १२२३४ चौरस किमी असून त्यापैकी वनक्षेत्र हे ३३०० चौरस किमी क्षेत्रावर पसरले आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षित क्षेत्र असलेल्या मेळघाटचे जंगल, महेंद्री राखीव जंगल, पोहरा-मालखेड राखीव जंगल व त्या भोवतालचे क्षेत्र तसेच सालबर्डी परिसरातील जंगल यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात काही गवताळ माळरानसुद्धा अस्तित्वात आहे. या वनक्षेत्रामुळे व देशातील सर्वात जुना व राज्यातील आकाराने सर्वांत मोठा असा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात असल्याने येथील वनक्षेत्र समाधानकारक आहे. यातील अर्ध्या क्षेत्रास संवर्धनाचा दर्जा प्राप्त असल्याने त्याचे कायद्याने संवर्धन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, वरूड तालुक्यातील महेंद्री जंगल आणि इतर जंगलांचा संवर्धनाअभावी ऱ्हास होत आहे. महेंद्री जंगल हे मेळघाट व पेंच या दोन जंगलांना जोडणारा व्याघ्र भ्रमण मार्ग आहे. त्यामुळे या जंगलाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसा प्रस्तावसुद्धा राज्य शासनाच्या वन्यजीव मंडळाला पाठविण्यात आला होता. परंतु त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल.

बॉक्स

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर

गावखेड्यातील पाण्याचे नियोजन यावर विशेष लक्ष देऊन भूजल पातळी पुन्हा वाढवण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी शहर व गावातील रहिवासी असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरावर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची (रेन वाटर हार्वेस्टिंग) यंत्रणा करावी लागेल. सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज मिळविण्यासाठी होणाऱ्या प्रदूषणाला आला घालावे लागेल. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वाटचाल न झाल्यास कोरोनासारख्या महामारीने भविष्यात मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवरून नष्ट केले, तर नवल वाटायला नको, असे मत पर्यावरण अभ्यासक जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.

------------------------