शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये सक्तीची कर्जवसुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:14 IST

वरूड : तालुकयातील सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीला सुरुवात केली आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली ...

वरूड : तालुकयातील सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीला सुरुवात केली आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली करीत असल्याने कर्जदार त्रस्त झाले आहेत. कोरोनाकाळात तब्बल सहा महिने उद्योग, कामधंदे बंद होते. त्यातच आता विजेचे बिल, कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी याबाबत संयुक्त बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढावा, अशी आर्जव कर्जदारांनी केली आहे.

कर्जवसुलीसाठी बँकांकडून नोटीस देऊन न्यायालयीन व फौजदारी कारवाई करण्याची तंबी वजा धमकी दिली जात असल्याची माहिती अनेक कर्जदारांनी ‘लोकमत’ला दिली. धनादेश अनादरित होत असल्याने फायनान्स कंपन्यांसह अन्य वित्तीय संस्था प्रकरणे दाखल करीत असल्यामुळे कर्जदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्थांना आवरणार कोण, अशी आर्त हाक कर्जदार देऊ लागले आहेत.

गतवर्षी दुकानदारांना मार्चपासून तर जुलैपर्यंत कोरोनाचा चांगलाच फटका बसला. चहाटपरीपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वच जण आर्थिक अडचणीत आले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. घर, वाहनाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यात केंद्र सरकारने तीन महिने दिलासा दिला. मात्र, कडक लॉकडाऊनमुळे मोडकळीस आलेला सर्वसामान्यांचा संसार वर्षभरानंतरही सुरळीत झालेला नाही. पोट भरायचे की बँक वा फायनान्स कंपन्यांचे हप्ते भरायचे, हा यक्षप्रश्न निर्माण झाला. साहजिकच पोट भरण्याकडे अधिक लक्ष दिले गेले. त्यामुळे २०२० च्या मार्चपासून कर्जाच्या हप्त्यांची रक्कम यंदाच्या जानेवारीपर्यंत लाखांच्या घरात गेली. त्यात महावितरणने वीज बिलाचा एकरकमी ‘शॉक’ दिला. यामुळे कर्जबाजारीपणा वाढल. तब्बल आठ महिन्यानंतर व्यवसाय उद्योग सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मात्र, आता जानेवारीपासून कर्जवसुलीचा तगादा सुरू झाला आहे.

कर्जदार विमनस्क स्थितीत

अनेक बँका, पतसंस्थांनी धनादेश अनादर प्रकरणेसुद्धा दाखल करून कर्जदारांना त्राहिमाम केले आहे. नोटिसांचा खर्च वाढत असताना कर्जवसुली पथके थेट घरापर्यंत पोहोचत आहे. शेतकरी, दुकानदार, व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. आधीच कोरोनामुळे डबघाईस आलेल्या दुकानदारांना सावरण्याची संधी देणे आवश्यक होते. परंतु, बँका, पतसंस्थांचा तगादा वाढल्याने कर्जदार विमनस्क अवस्थेत आला आहे. तालुक्यात शेकडोंनी फायनान्सवर ऑटोरिक्षा व मालवाहू वाहने घेतली. आता दोन महिन्यांपासून त्या वाहनांची चाके हलली. मात्र, सात ते आठ महिन्यांचे थकीत हप्ते भरण्याइतपत रक्कम गाठीशी आलेली नाही. त्यामुळे ती वाहने जप्त होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

धनादेश अनादराचा सर्वाधिक फटका

खासगी अवैध सावकारांनी कर्ज देताना मालमतांची आगाऊ इसारचिठ्ठी करवून घेतली आहे. कर्जाऊ रक्कम व्याजाने देण्यापूर्वी कोरे धनादेशसुद्धा घेतले आहेत. ते वटविण्यासाठी बँकेत टाकले जात आहेत. मात्र, संबंधितांच्या खात्यात पुरेश रक्कम नसल्याने त्या धनादेशांचा अनादर होत आहे. परिणामी, अनेकांना केवळ धनादेश अनादराचा दंड म्हणून मोठी रक्कम बँकेत भरावी लागत आहे. अनेक जण कर्जामुळे मालमत्ता गमावून बसले आहेत, तर बॅँक आणि सावकार गब्बर होऊ लागले आहेत. अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

----------------------------