शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

By admin | Updated: June 24, 2017 00:06 IST

पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे.

मनुष्यबळाचा अभाव : तीन महिन्यांपासून विद्यार्थी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परीक्षा विभागात पदवी देण्यासाठी कर्मचारी नाही, हे मूळ कारण असल्याची सत्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नामुष्कीने विद्यार्थ्यांना पदवीसाठी पायपीट करावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागअंतर्गत पदवी वाटप कक्ष आहे. या कक्षातून पदवी दिली जाते. त्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात महाविद्यालयीन विभागातून पदवी वाटप कक्षात बदली झालेले के.बी.पाटील हे अद्यापही पदवी वाटप कक्षात रुजू झाले नाही. त्यामुळे पदवी वाटप प्रक्रिया रेंगाळली आहे. पदवी मिळावी, यासाठी पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी विद्यापीठ गाठतात. मात्र, या कक्षात संबंधित कर्मचारी रुजू झाले नाही, अशी बतावणी करून विद्यार्थ्यांना पदवीविनाच आल्यापावली परतावे लागत आहे. दरदिवसाला ४० ते ५० विद्यार्थी हे पदवी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येतात. परंतु पदवी वाटप कक्ष कायम बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागते. तीन महिन्यांपासून पदवी वाटप कक्ष बंद असताना ते कसे सुरु करता येईल, याचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. आस्थापना विभागाने के.बी. पाटील यांची पदवी वाटप कक्षात बदली केली असेल तर ते तीन महिन्यांपासून का रुजू झाले नाही? याची चौकशी वजा शहानिशा झाली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षा विभागात सुमारे चार हजार पदवी वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. पदवी वाटपासाठी एक कर्मचारी मिळत नसेल तर चार हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने १० मार्च २०१७ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. यापैकी किती कर्मचारी बदलीच्या जागी रुजू झाले नाही, याचा आढावा कोणीही घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.पदवी वाटप केंद्रातील कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर पदवीसाठी कोणी विद्यार्थी आल्यास त्याला अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदवी वाटप केली जात आहे.- जयंत वडते,संचालक, परीक्षा मंडळ