शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

By admin | Updated: June 24, 2017 00:06 IST

पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे.

मनुष्यबळाचा अभाव : तीन महिन्यांपासून विद्यार्थी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परीक्षा विभागात पदवी देण्यासाठी कर्मचारी नाही, हे मूळ कारण असल्याची सत्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नामुष्कीने विद्यार्थ्यांना पदवीसाठी पायपीट करावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागअंतर्गत पदवी वाटप कक्ष आहे. या कक्षातून पदवी दिली जाते. त्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात महाविद्यालयीन विभागातून पदवी वाटप कक्षात बदली झालेले के.बी.पाटील हे अद्यापही पदवी वाटप कक्षात रुजू झाले नाही. त्यामुळे पदवी वाटप प्रक्रिया रेंगाळली आहे. पदवी मिळावी, यासाठी पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी विद्यापीठ गाठतात. मात्र, या कक्षात संबंधित कर्मचारी रुजू झाले नाही, अशी बतावणी करून विद्यार्थ्यांना पदवीविनाच आल्यापावली परतावे लागत आहे. दरदिवसाला ४० ते ५० विद्यार्थी हे पदवी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येतात. परंतु पदवी वाटप कक्ष कायम बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागते. तीन महिन्यांपासून पदवी वाटप कक्ष बंद असताना ते कसे सुरु करता येईल, याचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. आस्थापना विभागाने के.बी. पाटील यांची पदवी वाटप कक्षात बदली केली असेल तर ते तीन महिन्यांपासून का रुजू झाले नाही? याची चौकशी वजा शहानिशा झाली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षा विभागात सुमारे चार हजार पदवी वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. पदवी वाटपासाठी एक कर्मचारी मिळत नसेल तर चार हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने १० मार्च २०१७ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. यापैकी किती कर्मचारी बदलीच्या जागी रुजू झाले नाही, याचा आढावा कोणीही घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.पदवी वाटप केंद्रातील कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर पदवीसाठी कोणी विद्यार्थी आल्यास त्याला अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदवी वाटप केली जात आहे.- जयंत वडते,संचालक, परीक्षा मंडळ