शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

By admin | Updated: June 24, 2017 00:06 IST

पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे.

मनुष्यबळाचा अभाव : तीन महिन्यांपासून विद्यार्थी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परीक्षा विभागात पदवी देण्यासाठी कर्मचारी नाही, हे मूळ कारण असल्याची सत्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नामुष्कीने विद्यार्थ्यांना पदवीसाठी पायपीट करावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागअंतर्गत पदवी वाटप कक्ष आहे. या कक्षातून पदवी दिली जाते. त्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात महाविद्यालयीन विभागातून पदवी वाटप कक्षात बदली झालेले के.बी.पाटील हे अद्यापही पदवी वाटप कक्षात रुजू झाले नाही. त्यामुळे पदवी वाटप प्रक्रिया रेंगाळली आहे. पदवी मिळावी, यासाठी पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी विद्यापीठ गाठतात. मात्र, या कक्षात संबंधित कर्मचारी रुजू झाले नाही, अशी बतावणी करून विद्यार्थ्यांना पदवीविनाच आल्यापावली परतावे लागत आहे. दरदिवसाला ४० ते ५० विद्यार्थी हे पदवी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येतात. परंतु पदवी वाटप कक्ष कायम बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागते. तीन महिन्यांपासून पदवी वाटप कक्ष बंद असताना ते कसे सुरु करता येईल, याचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. आस्थापना विभागाने के.बी. पाटील यांची पदवी वाटप कक्षात बदली केली असेल तर ते तीन महिन्यांपासून का रुजू झाले नाही? याची चौकशी वजा शहानिशा झाली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षा विभागात सुमारे चार हजार पदवी वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. पदवी वाटपासाठी एक कर्मचारी मिळत नसेल तर चार हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने १० मार्च २०१७ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. यापैकी किती कर्मचारी बदलीच्या जागी रुजू झाले नाही, याचा आढावा कोणीही घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.पदवी वाटप केंद्रातील कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर पदवीसाठी कोणी विद्यार्थी आल्यास त्याला अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदवी वाटप केली जात आहे.- जयंत वडते,संचालक, परीक्षा मंडळ