शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यासाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग

By admin | Updated: March 20, 2017 00:01 IST

यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती.

पंचवटी चौकात आंदोलन : बळीराजाची व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती. १९ मार्च १९८६ मध्ये या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झालीत. राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जपण्यासाठी आणि जगाच्या पोशिंद्याचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी एकदिवसीय ‘अन्नत्याग’ आंदोलन करण्यात आले. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांच्या पुतळ्यासमोर उभारलेल्या मंडपात एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शासनाने शेतकरी कायद्यात सुधारणा करावी करून जगाच्या पोेशिंद्याला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून शंभर शेतकरी कुटुंबांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नैसर्गिक आपत्ती, शासनाची शेतकऱ्यांबद्दलची अनास्था यामुळे आतापर्यंत तब्बल लाखभर शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. याशेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपवास करण्यात आला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येला तब्बल ३१ वर्षे लोटली. सत्ताापालटही अनेकदा झाला. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. शासनाला शेतकऱ्यांची कणव येत नाही. त्यामुळेच पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जागवून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जगाला अन्न पुरविणाऱ्या अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग करण्याच्या किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून रविवारी राज्यभर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. याअन्नत्याग आंदोलनात चंद्रकांत मोहिते, हरिभाऊ मोहोड, नितीन पवित्रकार, विजय विल्हेकर, नितीन गुडधे, प्रकाश साबळे, प्रदीप पाटील, नितीन पवित्रकार, विशाल पवार, आकाश वडतकर, सुधीर हरणे, आशिष टेकाडे, अमोल देशमुख, राहुल इंगळे, नितीन धर्माळे, रोशन घोरमाडे संजय ठाकरे, मयुरा देशमुख, सीमा पाटील, संगीता शिंदे, शेखर भोयर, मयूर खोंडे, पुष्पा बोंडे, प्रदीप राऊत, वसंत लुंगे, ओंकार कोल्हे, रूपेश सवाई, ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : महेश तराळ, रंजना मामर्डे संजय वानखडे, बंडोपंत भुयार, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते. चांदूरबाजारमध्ये १०० शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी नंदकुमार बंड, राजाभाऊ देशमुख, पंकज आवारे, विजय कडू, तुषार देशमुख, अंकित देशमुख, रिद्धेश ठाकरे आदी सहभागी झाले होते. शेतकरी चळवळीचे बाबासाहेब लंगोटे यांच्याहस्ते उपवासाची सांगता करण्यात आली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातही आत्मक्लेश आंदोलन पार पडले. यावेळी राजेंद्र कोकाटे, प्रेमकुमार बोके, शरद कडू, रमेश काळे, प्रदीप निमकाळे, माणिक मोरे, उमेश काकड, सोपान साबळे, विनोद हागोणे, सुभाष खडसे यांच्यासह शेतकरी संघटनेचे माणिकराव मोरे प्रामुख्याने सहभागी झाले होते. इतर तालुक्यांतही आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. (प्रतिनिधी)जिल्हाभरात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येनंतर सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाला जाग कधी येणार, असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला.