शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

लोककलावंत विकताहेत भाजीपाला, सरकारी मदत केवळ नावाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य ...

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी

अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करीत आले आहेत. या लोकलावंतांप्रति उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तर अशी वर्गवारी पाडण्यात आली आहे. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन तुटपुंजे आहे. असे असले तरी कलावंतांसाठी आजच्या घडीला मोलाचा आधार ठरत आहे.

बॉक्स

मदत हातात किती उरणार ?

कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. परिणामी कलावंत संकटात सापडले आहेत.

पूर्वी ‘क’ वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होती. आता २२५० रुपये मिळते.

ही मदत काही मोजक्याच लोकांना हाती पडत आहेत. अनेक कलावंत अद्यापही उपेक्षित आहेत.

बॉक्स

राज्य सरकारची मदत कधी मिळणार?

५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.

ज्यावेळी निधी उपलब्ध होईल, त्यावेळी ही मदत लोककलांच्या खात्यात जमा होईल.

अनेक वेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात ८६० कलावंतांची यादी

दरवर्षी पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत कलावंतांची निवड केली जाते.

राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ दर्जा , आणि स्थानिक स्तरावर ‘क’ दर्जा असतो.

एका वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी २०० ते २५० अर्ज येतात.

बॉक्स

कलावंतांची फरफट

कोट

लोककलावंतांची अवस्था फार वाईट आहे. अनेक जण रोजमजुरी करत आहेत, तर काही महिला कलावंत शेतीच्या कामावर काम करीत आहेत. शासनाकडून उतरत्या वयातही कलावंतांना कुठलीही मदत नाही.आर्थिक आधार नसल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

- करुणा कदम, कलावंत

कोट

गत दोन वर्षांपासून हाताला काम नसल्याने शेतीचे काम करावे लागत आहे. अलीकडे रोजमजुरीचे साधन उरलेले नाही. या काळात पर्यायी व्यवसासायाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही. शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

- सुखदेव जामनिक, कलावंत

कोट

कोरोनामुळे गत दोन वर्षापासून कलावंताचे कार्यक्रम बंद आहे. हाताला काम नसल्याने भाजीपाला विकवा लागत आहे किंवा दुसरे मजुरीचे काम करावे लागत आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. म्हातारपणात आता कामही करणे होत नाही. त्यामुळे शासनाने कलावंताची जपणूक करून मदत करणे गरजेचे आहे.

- राजाभाऊ हातागडे, कलावंत