शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंत विकताहेत भाजीपाला, सरकारी मदत केवळ नावाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य ...

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी

अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करीत आले आहेत. या लोकलावंतांप्रति उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तर अशी वर्गवारी पाडण्यात आली आहे. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन तुटपुंजे आहे. असे असले तरी कलावंतांसाठी आजच्या घडीला मोलाचा आधार ठरत आहे.

बॉक्स

मदत हातात किती उरणार ?

कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. परिणामी कलावंत संकटात सापडले आहेत.

पूर्वी ‘क’ वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होती. आता २२५० रुपये मिळते.

ही मदत काही मोजक्याच लोकांना हाती पडत आहेत. अनेक कलावंत अद्यापही उपेक्षित आहेत.

बॉक्स

राज्य सरकारची मदत कधी मिळणार?

५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.

ज्यावेळी निधी उपलब्ध होईल, त्यावेळी ही मदत लोककलांच्या खात्यात जमा होईल.

अनेक वेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात ८६० कलावंतांची यादी

दरवर्षी पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत कलावंतांची निवड केली जाते.

राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ दर्जा , आणि स्थानिक स्तरावर ‘क’ दर्जा असतो.

एका वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी २०० ते २५० अर्ज येतात.

बॉक्स

कलावंतांची फरफट

कोट

लोककलावंतांची अवस्था फार वाईट आहे. अनेक जण रोजमजुरी करत आहेत, तर काही महिला कलावंत शेतीच्या कामावर काम करीत आहेत. शासनाकडून उतरत्या वयातही कलावंतांना कुठलीही मदत नाही.आर्थिक आधार नसल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

- करुणा कदम, कलावंत

कोट

गत दोन वर्षांपासून हाताला काम नसल्याने शेतीचे काम करावे लागत आहे. अलीकडे रोजमजुरीचे साधन उरलेले नाही. या काळात पर्यायी व्यवसासायाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही. शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

- सुखदेव जामनिक, कलावंत

कोट

कोरोनामुळे गत दोन वर्षापासून कलावंताचे कार्यक्रम बंद आहे. हाताला काम नसल्याने भाजीपाला विकवा लागत आहे किंवा दुसरे मजुरीचे काम करावे लागत आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. म्हातारपणात आता कामही करणे होत नाही. त्यामुळे शासनाने कलावंताची जपणूक करून मदत करणे गरजेचे आहे.

- राजाभाऊ हातागडे, कलावंत