शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

लोककलावंत विकताहेत भाजीपाला, सरकारी मदत केवळ नावाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य ...

कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी

अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करीत आले आहेत. या लोकलावंतांप्रति उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तर अशी वर्गवारी पाडण्यात आली आहे. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन तुटपुंजे आहे. असे असले तरी कलावंतांसाठी आजच्या घडीला मोलाचा आधार ठरत आहे.

बॉक्स

मदत हातात किती उरणार ?

कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. परिणामी कलावंत संकटात सापडले आहेत.

पूर्वी ‘क’ वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होती. आता २२५० रुपये मिळते.

ही मदत काही मोजक्याच लोकांना हाती पडत आहेत. अनेक कलावंत अद्यापही उपेक्षित आहेत.

बॉक्स

राज्य सरकारची मदत कधी मिळणार?

५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.

ज्यावेळी निधी उपलब्ध होईल, त्यावेळी ही मदत लोककलांच्या खात्यात जमा होईल.

अनेक वेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात ८६० कलावंतांची यादी

दरवर्षी पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत कलावंतांची निवड केली जाते.

राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ दर्जा , आणि स्थानिक स्तरावर ‘क’ दर्जा असतो.

एका वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी २०० ते २५० अर्ज येतात.

बॉक्स

कलावंतांची फरफट

कोट

लोककलावंतांची अवस्था फार वाईट आहे. अनेक जण रोजमजुरी करत आहेत, तर काही महिला कलावंत शेतीच्या कामावर काम करीत आहेत. शासनाकडून उतरत्या वयातही कलावंतांना कुठलीही मदत नाही.आर्थिक आधार नसल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

- करुणा कदम, कलावंत

कोट

गत दोन वर्षांपासून हाताला काम नसल्याने शेतीचे काम करावे लागत आहे. अलीकडे रोजमजुरीचे साधन उरलेले नाही. या काळात पर्यायी व्यवसासायाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही. शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

- सुखदेव जामनिक, कलावंत

कोट

कोरोनामुळे गत दोन वर्षापासून कलावंताचे कार्यक्रम बंद आहे. हाताला काम नसल्याने भाजीपाला विकवा लागत आहे किंवा दुसरे मजुरीचे काम करावे लागत आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. म्हातारपणात आता कामही करणे होत नाही. त्यामुळे शासनाने कलावंताची जपणूक करून मदत करणे गरजेचे आहे.

- राजाभाऊ हातागडे, कलावंत