शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
3
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
4
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
5
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
6
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
7
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
8
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
9
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
10
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
11
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
12
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
13
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
14
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
15
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
17
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
18
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
19
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

चाऱ्याचा दुष्काळ, १० लाख पशुधनाची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:11 IST

जिल्ह्यात उत्पादित चारा आता संपला. त्यामुळे १० लाख पशुधन अजून एक महिना जगवावे कसे, हा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे, बाजारात पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असल्याने आर्थिक संकटातील शेतकऱ्यांसमोर खरिपाच्या तोंडावर नवे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपशुपालकांसमोर संकट : पेरणीच्या तोंडावर जगविणार कसे? कृषिमंत्री लक्ष देणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात उत्पादित चारा आता संपला. त्यामुळे १० लाख पशुधन अजून एक महिना जगवावे कसे, हा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे, बाजारात पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असल्याने आर्थिक संकटातील शेतकऱ्यांसमोर खरिपाच्या तोंडावर नवे संकट निर्माण झाले आहे. कृषिमंत्री अनिल बोंडे याकडे लक्ष देणार का, असा पशुपालकांचा सवाल आहे.वैरण उत्पादनासंदर्भात शासनाच्या विविध योजनांद्वारे निर्माण झालेला हिरवा चारादेखील जून महिन्यात संपुष्टात आला आहे. शेतकºयांकडे बेगमी केलेले गव्हाचे, सोयाबीनचे अन् तुरीचे कुटार केव्हाच संपले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकही चारा छावणी नाही. आधीच पाणीटंचाईमुळे पशुपालक त्रस्त असताना वैरणटंचाईचा प्रश्न समोर आला आहे. बाजारात कुट्टीचे दर १५ रुपये किलो आहे. ढेप ३२ रुपये, तर धान्याची चुरीदेखील २५ ते ३० रुपये किलो या दराने विकली जात आहे. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वाढीव दरातील पशुखाद्य घेण्याची त्याची आर्थिक कुवत नाही. गोवंश कायद्यामुळे जनावरे विकली जात नाहीत. त्यामुळे शेतकºयांसमोर अनेक संकट एकाच वेळी आलेली आहेत.जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार मोठी जनावरे ५ लाख १२ हजार ६०, लहान जनावरे १ लाख ३८ हजार १६८ व शेळी-मेंढी ३ लाख ५३ हजार ३२७ असे एकूण १० लाख ३ हजार ३२७ पशुधन आहेत. जिल्ह्यात मागील हंगामात १० लाख १ हजार ७३५ मेट्रिक टन एकुण उत्पादीत चारा आहे. या सर्व पशुधनाला प्रतिमहिना १ लाख ५ हजार २४२ मेट्रिक टन चारा आहे. हा चार जिल्ह्यातील एकूण पशुधनाला सरासरी १० महिने पुरेल एवढाच असल्याने जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून जनावरांची उपासमार सुरू होणार असल्याचे दाहक वास्तव आहे.पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी उत्पादित चाºयामुळे चांदूरबाजार व धारणी तालुक्याची स्थिती चांगली आहे. चांदूर रेल्वे, धामणगाव व दर्यापूर तालुक्यात जेमतेम स्थिती आहे. त्याच्या तुलनेत अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चिखलदरा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा व वरूड तालुक्यात वैरणाची मे महिन्यापासूनच वानवा आहे. यासाठी शासनाने वैरण विकास , गाळपेर क्षेत्र, यासारख्या अनेक योजनांद्वारे पशुपालकांना वैरण बियाणे उपलब्ध करून हिरवा चारा निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र, हा चारा एक-दोन महिन्यात संपल्याने पशुधनाची उपासमार हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर तातडीच्या उपायांची आवश्यकता आहे.