शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

उड्डाणपुल बांधकामाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: November 10, 2016 00:11 IST

: नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने ....

बडनेरा मार्गावर वाहनधारकांचे हाल : कंत्राटदाराच्या मनमानीचा अतिरेकबडनेरा : नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने खासदार आनंदराव अडसुळांना दिला होता. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजून किती अवधी घेणार हा प्रश्न वाहनचालकांसाठी मन:स्तापाचा ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग येथे गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची सतत रेलचेल असते. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्यांची ये- जा राहते. पर्यायाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रवासी बडनेऱ्यातूनच प्रवास करतो. त्यामुळे अमरावती ते बडनेरा मार्गावर शहर बसेस, आॅटो इतर चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. तसेच नियमित अमरावती ते बडनेरा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड््यांमध्ये बारीक गिट्टी टाकण्यात आली आहे. येथे वाहनांमुळे धुळच धूळ राहते. अशातच खराब रस्त्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खासदार आनंदराव अडसुळ यांनी हा उड्डाणपुल लवकरच शहरवासिंयाच्या सेवेत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. अजून किती अवधी लागणार असा प्रश्न पुढे आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत रुग्णवाहिका जात असताना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सदर कंत्राटदार थातुरमातूर रस्ता बनवून वेळ काढूपणाचे धोरण आखत असल्याचे चित्र आहे. चार वर्षात कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी सर्वसामान्यांची हाक आहे. आठवडा भरात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)खासदारांनी पुन्हा घ्यावा पुढाकारनरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लांबतच चालले आहे. गेल्या चार वर्षांपासून येथून नादुरुस्त रस्त्यांवरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा मन:स्ताप होत आहे. उड्डाणपुलाचे काम होईस्तोवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनीच यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.