शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुल बांधकामाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: November 10, 2016 00:11 IST

: नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने ....

बडनेरा मार्गावर वाहनधारकांचे हाल : कंत्राटदाराच्या मनमानीचा अतिरेकबडनेरा : नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने खासदार आनंदराव अडसुळांना दिला होता. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजून किती अवधी घेणार हा प्रश्न वाहनचालकांसाठी मन:स्तापाचा ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग येथे गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची सतत रेलचेल असते. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्यांची ये- जा राहते. पर्यायाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रवासी बडनेऱ्यातूनच प्रवास करतो. त्यामुळे अमरावती ते बडनेरा मार्गावर शहर बसेस, आॅटो इतर चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. तसेच नियमित अमरावती ते बडनेरा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड््यांमध्ये बारीक गिट्टी टाकण्यात आली आहे. येथे वाहनांमुळे धुळच धूळ राहते. अशातच खराब रस्त्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खासदार आनंदराव अडसुळ यांनी हा उड्डाणपुल लवकरच शहरवासिंयाच्या सेवेत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. अजून किती अवधी लागणार असा प्रश्न पुढे आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत रुग्णवाहिका जात असताना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सदर कंत्राटदार थातुरमातूर रस्ता बनवून वेळ काढूपणाचे धोरण आखत असल्याचे चित्र आहे. चार वर्षात कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी सर्वसामान्यांची हाक आहे. आठवडा भरात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)खासदारांनी पुन्हा घ्यावा पुढाकारनरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लांबतच चालले आहे. गेल्या चार वर्षांपासून येथून नादुरुस्त रस्त्यांवरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा मन:स्ताप होत आहे. उड्डाणपुलाचे काम होईस्तोवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनीच यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.