शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पूरग्रस्तांनी थाटली जिल्हा कचेरी समोर राहुटी

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे.

अमरावती : मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे. वलगाव आणि रेवसा या गावालगत असलेल्या पेढी, रेणुका नदीला २००७ मध्ये महापुरांचा तडाखा बसून गावातील सुमारे ७०० कुटुंब प्रभावित झाले होते. घरे वाहून गेलीत, शेती खरडून निघाली. प्रचंड नुकसानीचा सामना गावकऱ्यांना करावा लागला होता. तेव्हापासून आजपर्यंत या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. वलगाव व रेवसा येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित करावे, यासाठी प्रशासनासह शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पुनर्वसनाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी न्यायासाठी जिल्हाकचेरी समोर तुराटीच्या झोपड्या थाटून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनात बसपचे प्रमोद तसरे, प्रशांत पाटील, शैलेश सुपारे, चंदू भगत राजेंद्र हजारे, रवींद्र पळसपगार, जगदीश भटकर, सुनील सावरकर, भारत तसरे, सत्यपाल रंगारी, रमेश तसरे, संदीप गेडाम, दीपक खोब्रागडे, अक्षय गजभिये आदी नागरिकांचा समावेश आहे.