शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

दर्यापूर तहसीलवर पूरग्रस्तांचा मोर्चा

By admin | Updated: July 3, 2014 23:19 IST

सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम

दर्यापूर : सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आ. अडसूळ यांनी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार राहुल तायडे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली. पूरग्रस्तांना आतापर्यंत घरे बांधण्यासाठी फक्त ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमध्ये केवळ ३० टक्केच पुनर्वसन झाले असून ७० टक्के पुनर्वसनाचे कार्य अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, वीज, पाणी आदी सोई पुरविण्यात आलेल्या नाहीत. पुनर्वसनग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघणार नाही, तोवर न हटण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. जिल्हाधिकऱ्यांनी ही समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ठाकूर जमात ही अनुसूचित जमातींमध्ये मोडते. तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठाकूर जमातीच्या ११ लोकांना जात प्रमाणपत्र दिले. पण, महिनाभरापूर्वी दर्यापूर येथे रुजू झालेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी नागरिकांच्या जात प्रमाणपत्र अर्जात त्रुटी काढून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे जात प्रमाणपत्रांअभावी या जमातीतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्यावरही उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर, तालुकाप्रमुख देवीदास वाळके, नाना देशमुख, बाबाराव पाटील बरवट, पं.स. सभापती मंगला रहाटे, गटविकास अधिकारी थोरात, मोहित चांदुरे, भैया बरवट, सुधीर खांदे, राजू कराळे, रूपेश गणात्रा आदी उपस्थित होते.