शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या वेदनांचा पूर

By admin | Updated: December 16, 2014 22:42 IST

शेतीनुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आलेल्या चार सदस्यिय पथकाने नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलू नटवा या गावांना भेटी दिल्यात. शेतकऱ्यांच्याशी संवाद साधला.

नांदगाव तालुक्यात भेट : केंद्रीय पथकाकडून शेतीनुकसानाची पाहणीसंजय जेवडे - अमरावतीशेतीनुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आलेल्या चार सदस्यिय पथकाने नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलू नटवा या गावांना भेटी दिल्यात. शेतकऱ्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या वेदनांचा जणू पूरच यावेळी समितीने अनुभवला. खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे आणि हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे तसेच फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. केंद्रीय पथकात प्रमुख आर.पी.सिंग यांच्या समवेत कृषि विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर साहुकार, अन्न महामंडळाचे सहसंचालक सुधीरकुमार तसेच विजयकुमार बाथला यांचा समावेश होता. सर्वप्रथम पथकाने जळू गावातील अमोल भाकरे, दिगंबर साखरकर यांच्या शेतीस भेट दिली. तेथील तूर, कापूस, सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. हवामान बदलामुळे पिकावर मोठ्या प्रमाणावर कीडीचा प्रादुर्भाव झाला, खरीपाचा पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्या लांबल्या. फुल, फळधारणा झाली नाही. जेमतेम १० टक्केच पीक आले, मशागतीवर मोठा खर्च झाला. आम्ही कर्जबाजारी झालो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. भरीव आर्थिक मदतीची जोरकसपणे मागणी रेटली. त्यानंतर लगेचच पथकाने टिमटाळा या गावी सरस्वती पाटील यांच्या शेतातील सोयाबीन, तूर तर विजय टेंबे यांच्या शेतीतील संत्रा बागेची पहाणी केली. या गावात कीडीमुळे जसे नुकसान झाले तसेच नुकसान रानडुक्कर, हरीण, नीलगाय आदी वन्यजीवांमुळेही झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.