शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

पाच वर्षांत १० हजारांवर रोपट्यांचे झाले वृक्षात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेम : जुळ्या शहरवासीयांची साथ, ग्लोबल वॉर्मिंग थांबविण्यासाठी एकवटले ध्येयवेडे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्याकरिता तालुक्यातील काही ध्येयवेड्यांनी एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी रोपट्यांची लागवड केली होती. त्यांची निगा राखल्याने सद्यस्थितीत त्या १० हजार रोपट्यांचे वृक्षात रुपांतर झाले आहेत.अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात. परतवाडा शहरात काही वर्षांपासून आदिवासी पर्यावरण संघटनेच्यावतीने त्याचा लेखाजोखा ठेवण्यात आला. पाच वर्षांत १० हजारांवर लावलेल्या रोपट्यांचे वृक्ष आणि आता झाडात रुपांतर होऊ लागले आहे. शहर सौंदर्यावर शासन-प्रशासन भर देत असला तरी वृक्षलागवड मोहिमेत फोटो काढून प्रसिद्ध करण्यापर्यंतच अनेकांची धावपळ असते. या सर्व बाबीला फाटा देत आदिवासी पर्यावरण संघटना एकला चलोप्रमाणे पुढे निघाली आणि त्यांच्या हाकेला ओ देत येथील प्रशासकीय अधिकारी सामाजिक संघटनांनी पुढे येऊन चांगल्या कामाची सुरुवात जुळ्या शहरात मागील पाच वर्षांपूर्वी केली, हे विशेष.शाळा, मंदिर-मशिद, चर्च परिसरात वृक्षारोपणआदिवासी पर्यावरण संघटनेने वृक्षलागवड मोहिमेत मंदिर-मशिद, मदरसा खुल्या जागेत सामाजिक वनीकरण, नगर परिषद व वनविभागाच्या सहकाऱ्याने लाखो झाडे लावलीत. यात संघटनेचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्रदीप चांदूरकर, प्यारेलाल प्रजापती, नवीन प्रजापती, राजेन्द्र मुंदे, ममता डहाके, मनीराम चिलाटी, राज इंगळे बाबाराव बेठे, किशन जामकर, सहकारी नागरिक जितु तुरकडे, संतोष मोहोकर आदींचा समावेश आहे.वृक्ष कटाईवरही लावले निर्बंधवृक्षलागवड मोहिमांवर जनजागृती करीत शालेय विद्यार्थी ते प्रशासकीय अधिकारी, नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. परंतु मनमर्जीने वृक्षकटाई मोहीम सुरू केल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. वृक्षकटाई करण्यापूर्वी पालिकेच्यावतीने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी सबंधितांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वृक्षकटाईला आळा बसणार आहे.

टॅग्स :forestजंगल